AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: काँग्रेस पराभवाच्या ‘सेंच्युरी’ची वाट पाहणार का? राहुल गांधी तारणहार की कारणहार? सविस्तर वाचा

Rahul Gandhi Congress worst performance: राहुल गांधी पराभवाची मालिका खंडीत करतील की नाही असा सवाल विचारला जात आहे. मतचोरीचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे वापरला. त्यांची जनतेशी पण चांगली नाळ जुळली आहे. पण या गोष्टी मतात परिवर्तन होताना दिसत नाही.

Rahul Gandhi: काँग्रेस पराभवाच्या 'सेंच्युरी'ची वाट पाहणार का? राहुल गांधी तारणहार की कारणहार? सविस्तर वाचा
राहुल गांधी, काँग्रेस, भाजप
| Updated on: Nov 15, 2025 | 9:59 AM
Share

Congress worst performance: बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025 (Bihar Election Result 2025) जाहीर झाला आणि काँग्रेसच्या अस्तित्वावर पुन्हा मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले. काँग्रेसने या निवडणुकीत 61 जागा लढवल्या. त्यातील केवळ 5 जागांवर त्यांना विजय मिळवता आला. आतापर्यंतचे काँग्रेसची ही सर्वात सुमार कामगिरी ठरली. बिहारमध्येच नाही तर यापूर्वी सुद्धा पराभवाची ही मालिका अखंडीत पणे सुरूच आहे. त्यामुळे राहुल गांधी पराभवाची मालिका खंडीत करतील की नाही असा सवाल विचारला जात आहे. सत्ताधारी त्यांना कोणत्याही नावाने हिणवत असले तरी तरुणांमध्ये आणि लोकांमध्ये त्यांच्याविषयी ओढ दिसते. पण त्यांना गर्दीचे परिवर्तन मतात करता येत नसल्याचे दिसून आले आहे.

पराभवाच्या शतकाची वाट पाहणार का?

बिहारच्या पराभवाने काँग्रेसची शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या 20 वर्षांत काँग्रेसला आतापर्यंत 95 ठिकाणी पराभवाला सामना करावा लागला. देशातील जवळपास प्रत्येक निवडणुकीत काही अपवाद वगळता काँग्रेसला फटका बसला आहे. देशातील अनेक राज्यात काँग्रेसचा जनाधार हरवत चालल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी जुने जाणते नेते पक्षाला सोडून गेले आहेत. अनेक ठिकाणी संघटनात्मक दरी वाढली आहे. अनेक ठिकाणी नेतृत्वाचे संकट उभे ठाकले आहे. या वैभवशाली पक्षाला संजीवनीची आणि एका हनुमानाची अत्यंत गरज असल्याची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने देशभरातील जवळपास मोठ्या राज्यात काँग्रेसला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. लोकसभाच नाही तर विधानसभा आणि स्थानिक निवडणुकीतही अनेक ठिकाणी पक्षाला नवसंजीवनीची गरज आहे. उत्तर प्रदेशापासून ते गुजरातपर्यंत पराभवाची लांबलचक यादी आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटकासारख्या राज्यात त्यांना धक्के बसले आहेत. उत्तर-पूर्व राज्य हे काँग्रेसचे गड मानण्यात येत होते. पण आता या राज्यात काँग्रेस निदान औषधाला तरी सापडेल की नाही अशी स्थिती उद्भवली आहे. 2018 पासून मध्य भारतातून काँग्रेस बाहेर फेकल्या जात आहे. ही घसरण अत्यंत वेगाने होत आहे. बिहारच्या निवडणुकीत गेल्यावेळी काँग्रेसकडे 19 आमदार होते. ही संख्या आता 5 वर येऊन ठेपली आहे.

सर्वाधिक पराभव कुठे?

या राज्यात सर्वाधिक वेळा पराभवाचा सामना

१. उत्तर प्रदेशात राहुल गांधींना सर्वाधिक वेळा पराभवाचे तोंड पाहावे लागले. वर्ष 2007, 2012, 2017, 2022 आणि आता 2025, सलग पाच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा आलेख घसरला आहे.

२. बिहारमध्ये काँग्रेसची अवस्था प्रत्येक निवडणुकीनंतर घसरत आहे. 2005, 2010, 2020 आणि आता 2025 मध्ये काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. येथे मिळवलेला विजय सुद्धा संघर्षातून आला आहे.

३. गुजरात राज्यात वर्ष 2007, 2012, 2017, 2022 या चार निवडणुकीत काँग्रेसला गड राखताना मोठी कसरत करावी लागली. पंतप्रधानांच्या किल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न अजून ही यशस्वी झालेला नाही. गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेसाठी दुसरा पर्याय ठरली नाही.

४. मध्य प्रदेश / राजस्थान / छत्तीसगडमध्ये वर्ष 2008, 2013, 2018, 2023 येथील पराभवानंतर काँग्रेसला त्यांचे संघटनही टिकवता आलेले नाही. अनेक नेत्यांना काँग्रेसकडे पाठ फिरवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

५. उत्तर-पूर्वेतील मिझोरम, मणिपुर, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशात 2018–2024 या काळात काँग्रेसला जवळपास नाकारण्यात आले आहे. हा भाग जणू काँग्रेसने गमावला आहे. गेल्या 20 वर्षांत काँग्रेसने जवळपास 95 निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना केला आहे.

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा