नवी मुंबई – नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला दुपारी तीन वाजता भीषण आग लागली होती. आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण करून कंपनीला वेडा घातला. ही माहिती अग्निशमन मिळाल्यानंतर तात्काळ तिथं पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. आग इतकी भयानक होती की शेजारच्या सहा कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. तिथले दोन कर्मचारी आग लागल्यानंतर बेपत्ता होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.