नवी दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Comedian Raju Srivastav) गेल्या चार दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी त्यांचा ब्रेन रिस्पॉन्स करत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. राजू श्रीवास्तव यांना शुद्धीवर आणण्यासाठी अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांचा आवाज ऐकवला जात आहे. त्यांचे हृदय आणि नाडीचे ठोके ठीक काम करत आहेत, पण त्यांचा मेंदू काम करत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांना पूर्णपणे शुद्धीत आणण्सायाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर मागील चार दिवसांपासून दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. शनिवारी राजू यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली होती. त्यांना पाईपद्वारे दूधही दिले जात आहे. त्यांचे हृदय आणि नाडीचे ठोके व्यवस्थित काम करत आहेत. मात्र, त्याचा मेंदू प्रतिसाद देत नाही.
राजू यांना शुद्धीवर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. बिग बींनी राजू श्रीवास्तव यांच्या फोनवर एक ऑडिओ मेसेज पाठवला आहे. त्यामध्ये ते त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी कामना करत आहेत. ‘राजू उठो, बस अब बहूत हुआ’, तुम्हे अब और काम करना है अस म्हणत या व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून अमिताभ राजू यांचे मनोबल वाढवत आहेत.
राजू अमिताभ बच्चन यांना आपला आदर्श मानतात. राजू कदाचित लवकर प्रतिसाद देऊ शकणार नाही, त्यामुळे त्याला एखाद्या प्रिय व्यक्तीचा आवाज ऐकू आला तर कदाचित ते प्रतिसाद देतील असे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगीतले होते. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अमिताभ बच्चन यांना सांगितले की, तुम्ही जो संदेश लिखित स्वरूपात पाठवले आहेत, ते ते बोलून पाठवू शकतात, जेणेकरून राजूला सांगता येईल. यानंतर बिग बींनी त्यांना ऑडिओ संदेश पाठवला आहे.
दुसरीकडे, शनिवारी सकाळी राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची अफवा पसरली होती. सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.
राजू श्रीवास्तव यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटका आला. तात्काळ त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी तिसर्यांदा त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली, त्यात 100% ब्लॉकेज आढळले. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. बोटे आणि खांद्यावर हालचाल झाली. काही तरी हालचाल होणे चांगले संकेत आहेत. मात्र, जलद सुधारणा नसणे हे चिंतेचे कारण असल्याचे डॉक्टर म्हणाले.