हैदराबादला कत्तलीसाठी नेत असलेल्या 57 उंटांना अकोल्यात जीवदान

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

गणेश सोनोने, टीव्ही 9 मराठी, अकोला : उंटांची तस्करी पुन्हा एकदा समोर आली आहे. राजस्थानमधून तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 57 उंटांना सोमवारी सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर येथे जीवदान मिळालं. हैदराबाद येथील पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन पातूर पोलिसांनी उंट ताब्यात घेतले. उंटांची किंमत सुमारे 57 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. […]

हैदराबादला कत्तलीसाठी नेत असलेल्या 57 उंटांना अकोल्यात जीवदान
Follow us on

गणेश सोनोने, टीव्ही 9 मराठी, अकोला : उंटांची तस्करी पुन्हा एकदा समोर आली आहे. राजस्थानमधून तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 57 उंटांना सोमवारी सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर येथे जीवदान मिळालं. हैदराबाद येथील पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन पातूर पोलिसांनी उंट ताब्यात घेतले. उंटांची किंमत सुमारे 57 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. उंटांच्या तस्करीमागे आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अकोलामार्गे 57 उंट हैदराबाद येथे नेण्यात येत असल्याची माहिती हैदराबाद येथील पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांनी पातूर तालुक्यातील चिचखेड फाट्यानजीक उंट ताब्यात घेतले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी पातूर पोलीस ठाणे गाठले असता पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यानंतर पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

राजस्थान सरकारने उंट हा अति संरक्षित प्राणी घोषित केला आहे. इंटरनॅशन युनियन फॉर कंझवर्हेशन ऑफ नेचर अ‍ॅण्ड नॅचरल रिसोर्सेस या आंतरराष्ट्रीय संस्थेने तर उंट हा जवळपास विलुप्त झालेला प्राणी घोषित केला आहे. उंटांच्या संरक्षणासाठी राजस्थान सरकारने 2015 मध्ये कायदा पारित केला. तरीही दरवर्षी राजस्थानातून शेकडो उंटांची पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये कत्तलीसाठी तस्करी केली जाते. पश्चिम बंगालमधून उंट पुढे बांगलादेशातही नेले जातात. राजस्थानातून एका उंटाची दहा ते पंधरा हजारात खरेदी केली जाते आणि कत्तलखान्यांना सुमारे एक लाख रुपयात विक्री केली जाते.

फूड अ‍ॅण्ड सेफ्टी स्टँडर्डस् अ‍ॅक्टनुसार उंटाचे मांस अखाद्य घोषित करण्यात आले आहे. भारतीय पशू कल्याण मंडळाने 14 ऑगस्ट 2017 रोजी तसे परिपत्रकदेखील जारी केले आहे. तरीही देशाच्या काही भागांमध्ये उंटाचे मांस भक्षण केले जाते आणि त्याच्या कातडीचेही विविध उपयोग आहेत. त्यामुळे उंटांना मोठी मागणी आहे. या अवैध व्यवसायात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. उत्तर प्रदेशमधील बागपत आणि गाझियाबाद आणि हरियाणातील मेवात ही उंट तस्करांची मोठी केंद्रे आहेत.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी उस्मानाबादजवळ कारवाई करत 14 उंटांची सुटका केली होती. पण या उंटांना एवढ्या अमानुष पद्धतीने ट्रकमध्ये भरण्यात आलं होतं, की त्यांचा काही दिवसातच मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा यापद्धतीने उंटांची तस्करी समोर आल्याने विलुप्त होत असलेल्या प्रजातीही सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.