भारत लवकरच चीनच्या लोकसंख्येचा विक्रम मोडणार

| Updated on: Jun 18, 2019 | 1:32 PM

भारत पुढील 8 वर्षात म्हणजेच 2027 पर्यंत चीनलाही मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल. भारतात 2019 ते 2050 पर्यंत 27:30 कोटी लोकसंख्या वाढेल.

भारत लवकरच चीनच्या लोकसंख्येचा विक्रम मोडणार
'सिंगल चाइल्ड फॅमिली'ला सरकार देणार 1 लाख रुपये !
Follow us on

नवी दिल्ली : भारत पुढील 8 वर्षात म्हणजेच 2027 पर्यंत चीनलाही मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल. भारतात 2019 ते 2050 पर्यंत 27:30 कोटी लोकसंख्या वाढेल. आता भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे. तर चीनची लोकसंख्या 143 कोटी आहे. चीनमध्ये जगातील 19 आणि भारतात 18 टक्के लोकसंख्या आहे. 32.90 कोटी लोकसंख्येसह अमेरिका तिसऱ्या आणि 27.10 कोटीसह इंडोनेशिया चौथ्या नंबरवर आहेत. 2050 पर्यंत संपूर्ण जगातील लोकसंख्या 200 कोटीपर्यंत वाढेल आणि एकूण लोकसंख्या 970 कोटी होईल. अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉसपेक्ट्सच्या अहवालातून समोर आली आहे.

अहवालानुसार, लोकसंख्येसह लोकांचे वय वाढत आहे. 2050 पर्यंत 6 मेपासून 1 व्यक्ती 65 वर्षाचा होईल. याचा अर्थ जगातील 16 टक्के लोक वोयवृद्ध असतील. आता 2019 मध्ये 11 टक्के वयोवृद्धांची लोकसंख्या आहे. प्रत्येक 9 मेपासून 1 माणूस वयोवृद्ध होत आहे.

या दशकाच्या शेवटपर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटी होईल. लोकसंख्येवर नियंत्रण मिळवल्यामुळे चीनची लोकसंख्या 110 कोटी होईल. 73.30 कोटीसह नायझेरिया तिसऱ्या, 43.40 कोटींसह अमेरिका चौथ्या आणि 40.30 कोटींसह पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर असेल. या दशकाच्या शेवटपर्यंत जगातील लोकसंख्या 1100 कोटी असेल.

जगातील या 9 देशात लोकसंख्या वाढणार

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, 2050 पर्यंत जगातील लोकसंख्येपेक्षा सर्वाधिक वाढ या 9 देशात होणार आहेत. भारत, नायझेरिया, पाकिस्तान, कॉन्गो, इथिओपिया, टांजानिया, इंडोनेशिया, मिस्रि आणि अमेरिका. भारत 2027 पर्यंत चीनलाही मागे टाकेल आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल.

जगातील 23 टक्के लोक भारत आणि नायझेरियामध्ये

2019 ते 2050 च्यामध्ये भारतात 27.30 कोटी लोक वाढतील. यावेळी नायझेरियामध्ये 20 कोटी लोकांची वाढ होईल. 2050 पर्यंत दोन्ही देशात जगातील 23 टक्के लोक राहतात.