इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कसलाही विचार न करता आरोप केले, मात्र चौकशी करत होतो, त्यामुळे आमच्याकडून उत्तर द्यायला उशीर झाला, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या लष्कराने पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
1947 पासून काश्मिरींवर अत्याचार होत आहेत, असा आरोप पाकिस्तानी लष्कराने भारतावर केला आहे.
“पाकिस्तान जेव्हा कधी काही महत्त्वपूर्ण होणार असतं, त्याचवेळी भारताकडून असे आरोप केले जातात. पुलवामा हल्ल्यातून पाकिस्तानला काय फायदा आहे? उलट पाकिस्तानला नुकसानच आहे. कारण ग्लोबल फ्रंटवर पाकिस्तानला वेगळ पाडलं जात आहे.” असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.
भारताने पाकिस्तानवर कुठल्याही पुरव्याविना आरोप केले आहेत, जेव्हा कधी भारतात हल्ले होतात, तेव्हा पाकिस्तानलचा जबाबदार ठरवले जाते, असेही पाकिस्तान लष्कराने म्हटले.
महत्त्वाचे मुद्दे :
VIDEO :