पाकिस्तानी विमानांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न, वायूसेना हायअलर्टवर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पुछंमध्येही LoC वर पाकिस्तानची दोन विमानं दिसली. मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं LoC च्या अतिशय जवळ आली होती. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या या घुसखोरी करणाऱ्या विमानांचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानच्या या घुसखोरीमुळे भारतीय वायूसेनाही हाय अलर्टवर आहे. रात्री उशिरा आलेल्या पाकिस्तान विमानांचा वेगही […]

पाकिस्तानी विमानांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न, वायूसेना हायअलर्टवर
Follow us on

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पुछंमध्येही LoC वर पाकिस्तानची दोन विमानं दिसली. मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं LoC च्या अतिशय जवळ आली होती. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या या घुसखोरी करणाऱ्या विमानांचा प्रयत्न हाणून पाडला.

पाकिस्तानच्या या घुसखोरीमुळे भारतीय वायूसेनाही हाय अलर्टवर आहे. रात्री उशिरा आलेल्या पाकिस्तान विमानांचा वेगही जास्त होता आणि यावेळी त्यांनी साऊंड बॅरिअरही तोडून दहशत पसरवली. 26 फेब्रुवारीला भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान कुरापती करत आहे.

पाकिस्तानने आजही सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. या दरम्यान पाकिस्तानने LoC वर असलेल्या ट्रेड सेंटरवरही हल्ला केला. चक्का दा बागमधील सेंटरवर पाकिस्तानकडून दोन शेल टाकण्यात आले.

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांचे नुकसान होत आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतानेही आक्रमक असे उत्तर दिले आहे. भारत-पाकमध्ये सुरु असलेल्या गोळीबारीमुळे दोन्ही देशांतील व्यापार बंद आहे. यापूर्वीही पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील व्यापार थांबवण्यात आला होता. या आकड्यानुसार 26 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकनंतर आतापर्यंत पाकिस्तानकडून 80 वेळा शस्त्रसंधीच उल्लंघन करण्यात आलं आहे आणि सामान्य जनतेवर निशाणा साधला जात आहे.