Corona : 15 दिवस खाद्याचा तुटवडा, दीड लाख कोंबड्या उपाशी

| Updated on: Mar 31, 2020 | 1:34 PM

कोंबड्यांना गेल्या 15 दिवसांपासून पशू खाद्य न मिळाल्याने कोंबड्या एकमेकींना मारुन खात (poultry farm business loss sangli) आहेत.

Corona : 15 दिवस खाद्याचा तुटवडा, दीड लाख कोंबड्या उपाशी
Follow us on

सांगली : कोंबड्यांना गेल्या 15 दिवसांपासून पशू खाद्य न मिळाल्याने कोंबड्या एकमेकींना मारुन खात (poultry farm business loss sangli) आहेत. हा धक्कादायक प्रकार सांगलीतील मिरज येथील पेठवडगाव आणि हातकणंगले परिसरात घडत आहे. बाला इंडस्ट्रीज अँड इंटरटेनमेंट कंपनीने दीड लाख कोंबड्या शेतकऱ्यांना दिल्या आहेत. कोंबड्या एकमेकींना मारुन खात असल्यामुळे भविष्यात येथे मोठी रोगराई पसरु शकते. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात (poultry farm business loss sangli) आहे.

हातकणंगले तालुक्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुण शेती बरोबर पोल्ट्रीचा व्यवसाय करतात. बहुतेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरु केला आहे. मिरज इथल्या बाला इंडस्ट्रीज अँन्ड इंटरटेनमेंट कंपनी पेठवडगांव आणि हातकणंगले परीसरातील शंभरहून अधिक शेतकर्यांना दीड लाख अंडी उगवणीसाठी कोंबड्या पुरवल्या होत्या.

अंडी उबवल्यापासून 40 दिवसापर्यंत त्यांना कंपनीच्या सांगली जिल्ह्यातील कानंदवाडी इथल्या पशुखाद्य कारखान्यातून पशू खाद्य पुरवठा केला जातो. 40 दिवसानंतर कोंबड्या कंपनी परत नेते आणि शेतकऱ्याला मजुरी देते. पण कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने या कंपनीने परीसरातील जवळपास दीड लाख कोंबड्यांना पशू खाद्य नाकारलं आहे. प्रशासनान पशुखाद्यसाठीचा परवाना घेवुन पशुखाद्य वितरण करण्यास मुभा दिली असतानाही पशुखाद्य देण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

कोंबड्या उचलण्याचा कालावाधी संपून 10 ते 15 दिवस झाले तरीही कोंबड्या नेल्या नाहीत. तसेच पशुखाद्य ही दिलं नाही. त्यामुळे भुकेनं व्याकुळ झालेल्या कोंबड्या एकमेकांना मारुन खात आहेत. येत्या काही दिवसात व्यवस्था न झाल्यास लाखो कोंबड्या भुकेनं मरुन जातील अन रोगराई मोठ्या प्रमाणात पसरेल. याचा सर्वाधिक फटका पेठवडगांव सह परीसराला बसणार आहे. सद्या या परीसरात दुर्गंधी पसरली असून माशांचे प्रमाण वाढलं आहे. याबाबत पेठवडगांव नगरपालीका नगराध्यक्ष मोहनलाल माळी आणि मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांचेकड तक्रार केली असून नगराध्यक्ष माळी यांनी कंपनी अधिकार्यांशी संपर्क केला असता कंपनी अधिकाऱ्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.