सरकारी जमीन गहाण ठेवून 20 लाखांचं कर्ज, शिवसेनेच्या माजी सरपंचाचा प्रताप

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

बुलडाणा : थेट सरकारचीच जमीन गहाण ठेवून कर्ज घेण्याचा प्रताप शिवसेनेच्या माजी सरपंचाने केला आहे. तब्बल दोन हेक्टर 20 आर जमिनीची बनावट 7/12 आणि इतर कागदपत्र बनवून बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीकडून तब्बल 20 लाख रुपयांचे कर्ज शिवसेनेचे माजी सरपंच आणि नेते रवींद्र पाटील यांनी घेतले. एका तक्रारीनंतर सेनेच्या माजी सरपंचाचा प्रताप उघडकीस आला असून, […]

सरकारी जमीन गहाण ठेवून 20 लाखांचं कर्ज, शिवसेनेच्या माजी सरपंचाचा प्रताप
Follow us on

बुलडाणा : थेट सरकारचीच जमीन गहाण ठेवून कर्ज घेण्याचा प्रताप शिवसेनेच्या माजी सरपंचाने केला आहे. तब्बल दोन हेक्टर 20 आर जमिनीची बनावट 7/12 आणि इतर कागदपत्र बनवून बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीकडून तब्बल 20 लाख रुपयांचे कर्ज शिवसेनेचे माजी सरपंच आणि नेते रवींद्र पाटील यांनी घेतले. एका तक्रारीनंतर सेनेच्या माजी सरपंचाचा प्रताप उघडकीस आला असून, सध्या रवींद्र पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र पाटील सध्या फरार आहे. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहेत.

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे सरकारची गट नं. 584 मध्ये  8 हेक्टर 73 आर ई-क्लास जमीन असून, यापैकी दोन हेक्टर 22 आर जमिनीवर वैयक्तिक कर्ज घेण्यात आले असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश गवई यांनी समोर आणली होती. यासंदभार्त महसूल विभागाकडे त्यांनी तक्रारही दिली होती. त्यानंतर चौकशीदरम्यान असे निदर्शनास आले की, सन 2010 मध्ये साखरखेर्डा येथील तलाठी आणि मंडळ अधीकारी यांनी माजी सरपंच रवींद्र पाटील यांच्यासोबत संगनमत करुन सदर जमीनीच्या बनावट 7/12 आणि इतर कागदपत्र तयार करून रवींद्र  पाटील यांनी बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीला  20 लाख रुपयाचे गहाण खत करुन दिले आणि त्यावर 20 लाखांचे कर्ज घेतले.

एवढेच नव्हे, तर सरकारी जमिनीच्या 7/12 वर 20 लाखांचा बोजाही चढवला. तर हे करत असताना बुलडाणा अर्बन को.ऑप.सोसायटीचे वकीलांनी कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता त्या जमिनीचा म्हणजेच 2 हेक्टर 22 आर जमीन रवींद्र  पाटील यांच्या मालकीचे असल्याचा सर्च रिपोर्ट अहवालही दिला. तर  बँकेकडे आरोपी रवींद्र पाटील हे त्या शासकीय जमिनीचे मालक असलयाचे भासवले आणि त्यावर 20 लाखांचे कर्ज घेतले.

यासंदभार्त उपविभागीय अधिकारी ह्यांनी चौकशी समिती नेमून चौकशी केली असता हे सिद्ध  झाले आहे. माजी सरपंच रवींद्र पाटील यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाच्या जमिनीवर कर्ज घेतले आणि व्यक्तिक कर्ज घेऊन ते परतफेड न करता बँकेसह बनावट 7/12 , फेरफार तयार करुन सरकारची फसवणूक केली आहे. याप्रकरणी महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी साखरखेर्डा येथील पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे आणि त्यावरुन पोलिसांनी शिवसेनेचे माजी सरपंच तथा रवींद्र पाटील यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून आरोपी सध्या फरार आहे. मात्र या प्रकरणात अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.