शेट्टी इफेक्ट! FRP थकवणाऱ्या 14 साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश
पुणे : एफआरपीप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल साखर आयुक्तांची भेट घेतली आणि आज साखर आयुक्तांनी साखर काखान्यांना दणका दिला आहे. एफआरपी थकवल्याप्रकरणी राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. राज्यातील 14 साख आयुक्तांकडून 251 कोटींच्या थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना साखर आयुक्तांनी आदेश दिले आहेत. राज्यात […]
Follow us on
पुणे : एफआरपीप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल साखर आयुक्तांची भेट घेतली आणि आज साखर आयुक्तांनी साखर काखान्यांना दणका दिला आहे. एफआरपी थकवल्याप्रकरणी राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
राज्यातील 14 साख आयुक्तांकडून 251 कोटींच्या थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना साखर आयुक्तांनी आदेश दिले आहेत. राज्यात एकूण 3595 कोटी रुपये इतकी थकीत एफआरपी आहे. याच प्रकरणी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेतली होती. त्याच्या दुसर्याच दिवसी साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.
कुठल्या कारखान्याचे किती एफआरपी थकीत?
किसनवीर प्रतापगड साखर कारखाना ( सातारा) – २४.६३ कोटी
विठ्ठल रिफाईड साखर कारखाना ( सोलापूर ) – २६.७१ कोटी
जय भवानी साखर कारखाना ( बीड ) – ३०.२४ कोटी
रेणुका शुगर – रत्नप्रभा कारखाना ( सोलापूर ) १५.७३ कोटी
बबनराव शिंदे साखर कारखाना ( सोलापूर ) – १९.६० कोटी
जयहिंद साखर कारखाना ( सोलापूर ) – १६.२४ कोटी
पणगेश्वर साखर कारखाना ( लातूर ) – १३.६८ कोटी
जयलक्ष्मी – शीला अतुल साखर कारखाना ( उस्मानाबाद ) – ७.८३ कोटी
संत कुर्मदास साखर कारखाना ( सोलापूर ) – १२.२२ कोटी
त्रीधारा साखर कारखाना ( परभणी )- ३०.८२ कोटी
डेक्कन शुगर सागर साखर कारखाना ( यवतमाळ) – २.७५ कोटी