अफगाणी विद्यार्थ्यांची आदित्य ठाकरेंना साद, केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ठाकरेंची ग्वाही

| Updated on: Aug 17, 2021 | 6:55 PM

पुणे आणि मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांनी आज राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांचा आपल्या नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी भयभीत झाले आहेत. या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालयामार्फत नातेवाईकांशी संपर्क करुण देणं आणि महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत आदित्य ठाकरे आणि विद्यार्थ्यांमध्ये आज चर्चा झाली.

अफगाणी विद्यार्थ्यांची आदित्य ठाकरेंना साद, केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ठाकरेंची ग्वाही
अफगाणीस्तानातील विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट
Follow us on

मुंबई : अफगाणिस्तानात उद्भवलेल्या भयावह परिस्थितीमुळे भारतात शिकणारे अफगाण विद्यार्थी भयभीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांनी आज राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांचा आपल्या नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी भयभीत झाले आहेत. या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालयामार्फत नातेवाईकांशी संपर्क करुण देणं आणि महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत आदित्य ठाकरे आणि विद्यार्थ्यांमध्ये आज चर्चा झाली. (Afghan students studying in Maharashtra met Aditya Thackeray)

अफगाण विद्यार्थ्यांची मागणी काय?

अफगाणिस्तानातून महाराष्ट्रात एकूण 5 हजार विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. आम्हाला मदतीची गरज आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहता आम्हाला भारताने आश्रय दिला पाहिजे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळेच तालिबानने अफगाणीस्तानात प्रवेश केला आहे. आम्ही आदित्य ठाकरे आणि सरकारचे आभारी आहोत. त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला, आमच्या समस्या ऐकल्या. आम्ही सरकारची भेट घेतली कारण आम्ही तालिबानचा विरोध करतो. अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट झाली आहे. महिला सुरक्षित नाहीत. आमचे कुटुंब अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षा मिळू द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

अफगाणी विद्यार्थ्यांच्या मागणी केंद्रात मांडणार – आदित्य ठाकरे

दरम्यान, अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अफगाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकलं. काही विद्यार्थ्यांचा व्हिसा संपत आहे, तर काही विद्यार्थ्यांचा व्हिसा अजून दोन-तीन वर्षांसाठी आहे. व्हिसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करु. केंद्र सरकारपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रश्न पोहोचवणार आहे. 3 हजार 500 ते 4 हजार अफगाणी विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासन आदित्य यांनी यावेळी दिलंय.

भारताने सुरू केला ई-आणीबाणी एक्स-मिस्क व्हिसा

अफगाणिस्तानवर तालिबानींनी कब्जा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तेथील परिस्थिती पाहता भारताने आपले व्हिसा नियम बदलले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. या व्हिसाला ई-आणीबाणी X-Misc व्हिसा असे म्हटले आहे. भारतात येण्यासाठी व्हिसा अर्ज फास्ट ट्रॅक करणे हा त्याचा हेतू आहे.

काय आहे या व्हिसाचा उद्देश?

व्हिसाशी संबंधित समस्यांसाठी असलेल्या नोडल मंत्रालयाने या नवीन व्हिसासंदर्भात मंगळवारी घोषणा केली आहे. इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन श्रेणी देखील गृह मंत्रालयाकडून ट्विट करून सांगण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून असे सांगण्यात आले आहे की भारताने व्हिसाची एक नवीन श्रेणी सुरू केली आहे जेणेकरून व्हिसाची प्रक्रिया सुलभ आणि लहान करता येईल. यासह, अडचणीत अडकलेल्या गरजूंना त्वरित मदत दिली जाईल. काबुलमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइटनुसार, भारतात प्रवेश करण्यासाठी दोन प्रकारचे व्हिसा आवश्यक आहेत.

संबंधित बातम्या :

एअर फोर्सचं विमान 120 नागरिकांना घेऊन भारतात दाखल, भारत माता की जयच्या घोषणेनं मायभूमीत स्वागत

Afghanistan Crisis: ज्या विमानात बसण्यासाठी एसटीसारखी झुंबड उडाली, विमानात काय स्थिती होती? व्हायरल फोटो पाहिले का?

Afghan students studying in Maharashtra met Aditya Thackeray