औरंगाबादः व्यापारी पिकांना योग्य भाव देत नसल्याने उभी केळीची बाग आपल्या हाताने भुईसपाट करण्याचा कठोर निर्णय पैठणच्या शेतकऱ्याने (Banana Farmer) घेतला. पैठण तालुक्यातील (Paithan Farmer) हिरडपुरी गावातील ही घटना असून केळीला योग्य भाव नसल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला. त्याने आपल्याच हाताने केळीची बाग उध्वस्त केली.
पैठण तालुक्यातील हिरडपुरी गावातील शेतकऱ्याने आपल्याच हाताने हिरव्यागार केळी लगडलेली झाडं उपटून टाकली. बागवान लोक आणि व्यापारी केळीला योग्य भाव देत नसल्याने शेतकऱ्याने हे निराशाजनक कृत्य केले.
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून शुक्रवारी रात्री राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. तालुक्यातील पळशी येथील सोनारी रस्त्यावर असणाऱ्या आपल्या स्वतःच्या शेतातील घरात भिकन बडक या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सोनारी शिवारात त्यांची तीन एकर जमीन आहे. मुलीच्या लग्नाची चिंता, मुलांचे शिक्षण व सततच्या नापिकीला कंटाळून या शेतकऱ्याने घगरात गळफास घेऊन जीवन संपवले.
इतर बातम्या-