युवराजांनी आता म्हातारीच्या बुटाचा हट्ट करु नये, आरे, नाईट लाईफवरुन शेलारांचं टीकास्त्र

| Updated on: Jan 30, 2020 | 1:44 PM

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'मुंबई 24 तास' या योजनेवरुन आशिष शेलार यांनी टीका केली आहे (Ashish Shelar slam Aaditya Thackeray).

युवराजांनी आता म्हातारीच्या बुटाचा हट्ट करु नये, आरे, नाईट लाईफवरुन शेलारांचं टीकास्त्र
Follow us on

मुंबई :  “मुंबईकरांनी बालहट्टच पुरवायचे का?”, असा खोचक सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे (Ashish Shelar slam Aaditya Thackeray). आरे कारशेडबाबत मेट्रो कारशेड समितीने दिलेला अहवाल महाराष्ट्रासाठी बंधनकारक नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला (Ashish Shelar slam Aaditya Thackeray).

आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आदित्य ठाकरेंवर टीका केली. “पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बूट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं”, असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

मुंबईतील मेट्रो-3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीत जागाच योग्य असल्याचा अहवाल चार सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, त्या समितीचा अहवाल महाराष्ट्र सरकारसाठी बंधनकारक नसल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील काही जागा फडणवीस सरकारकडून निश्चित करण्यात आली होती. मात्र, पर्यावरणप्रेमी आणि अनेक मुंबईकरांकडून आरे कारशेडला विरोध करण्यात आला. कारण कारशेडसाठी आरेतील शेकडो झाडे तोडावी लागणार होती. जनतेचा विरोध पाहता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली.