Rajya Sabha elections : राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करावं लागतं का?, जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया

| Updated on: Jun 10, 2022 | 6:34 AM

निवडणुकीच्या गोष्टी माहिती करून घेण्यापूर्वी आपण राज्यसभा आणि लोकसभा थोडक्यात समजून घेऊ या. लोकसभेत 543 निवडलेले आणि 2 नेमणूक केलेले असे एकूण 545 खासदार असतात.

Rajya Sabha elections : राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करावं लागतं का?, जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया
राज्यसभेची निवडणूकीत पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करावं लागतं का?
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – राज्यसभेची (Rajya Sabha elections) निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकारणात पडगम वाजायला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची काळजी घेताना पाहायला मिळाले. खरं म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (bjp) काटे की टक्कर पाहायला मिळणार असं वाटतंय. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठक घेतली. त्यामध्ये आमदारांशी संवाद साधला. भाजप काल पंचतारांकीत हॉटेलमध्ये आमदारांशी संवाद तयारी करताना दिसून आलं. सर्व आमदारांना मतदान प्रक्रिया समजून सांगितली गेली आहे. विशेष म्हणजे सहा जागांवर सात उमेदवार आहेत. छोट्या पक्षांच्या आमदारांना आणि अपक्ष आमदारांना अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

थोडक्यात लोकसभा राज्यसभा समजून घेऊया

निवडणुकीच्या गोष्टी माहिती करून घेण्यापूर्वी आपण राज्यसभा आणि लोकसभा थोडक्यात समजून घेऊ या. लोकसभेत 543 निवडलेले आणि 2 नेमणूक केलेले असे एकूण 545 खासदार असतात. ही निवडणूक दर पाच वर्षांनी होते. राज्यसभेत 250 खासदार असतात. राज्यसभेत 238 निवडलेले आणि 12 नेमलेले खासदार असतात. राज्यसभेच्या निवडणुका दर दोन वर्षांनी होतात. राज्यसभेचे एक तृतीयांश खासदार दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे खासदार आमदारांनी केलेल्या मतांवर निवडून येतो. तर लोकसभेचा खासदार सामान्य लोकांनी केलेल्या मतदानावरती निवडून येतो.

अशी असते मतदानाची पद्धत

राज्यसभेत प्रत्येक एका आमदाराच्या मताचं मुल्य शंभर असतं. महाराष्ट्रात सध्या 287 आमदार आहेत. सर्व आमदारांच्या मताचं मूल्य होईल 28,800 इतकं होतं. जेवढे खासदार निवडायचे आहेत. त्या एक आकडा अधिक करून त्या आकड्याने मुल्य असलेल्या आकड्याला भागायचे. त्यातून जो भागाकार येईल त्यात एक मिसळायचा. महाविकास आघाडीला आपले उमेदवार निवडून आणायचे असतील तर 168 मतांची गरज आहे. म्हणजेचं त्यांना 16 अतिरिक्त मतांची गरज आहे. भाजपला 126 मतांची गरज आहे. त्यांचे तीन उमेदवार आहेत. त्यांना 20 मतं कमी आहेत.

पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करावं लागतं का?

राज्यसभेच्या निवडणुकीत तुम्ही ज्या पक्षाचे आमदार आहात. त्या पक्षाने सांगितलेल्या उमेदवाराला मतदान करावे लागते. पक्षाकडून एजंट नेमलेले असतात. आमदारांना केलेलं मतदान मतदान पेटीत टाकण्यापुर्वी संबंधित एजंटला दाखवावे लागते. जे अपक्ष आमदार आहेत त्यांनी न दाखवण अपेक्षित असतं.