पुणे : जागतिक आर्थिक परिषदेच्या दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सामंजस्य करार केले. दावोस येथे पहिल्या दिवशी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रुखी फुड्सचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा रिन्युएबल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळं ६,३०० जणांना रोजगार मिळेल. मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोस दोऱ्यात काय झालं, हे सांगितलं. त्यावर आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यांचे युनिट महाराष्ट्रात त्यांनीच राज्यात दावोसमध्ये करार केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून अजित पवार (Ajit Pawar) यांनी टोले लगावले.
अजित पवार म्हणाले, दावोसच्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या शेजारी बसलो असताना त्यांना विचारलं. ते म्हणाले, आम्ही एमओयू केले. त्यातील काही उद्योगपती आपल्या महाराष्ट्रात येऊन एमओयू करू पाहत आहेत. ज्यांचे युनिट महाराष्ट्रात आहेत, अशांनीचं तेथे एमओयू केले. असं दबक्या आवाजात काही जण बोलतात.
पोटनिवडणुकीबाबत कार्यकर्ते म्हणतात,…
पोटनिवडणुकीच्या दोन्ही जागा लढविण्यााची कार्यकर्त्यांची मागणी आहे, असं अजित पवार यांनी म्हंटलं. पिंपरी चिंचवड, कसब्याच्या पोटनिवडणुकीवर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, ज्यावेळी अशाप्रकारच्या पोटनिवडणुका लागतात. त्यावेळी आम्ही मुंबईत असताना सर्व जण चर्चा करतो. मुंबईत २३, २४ जानेवारीला आहोत.
भाजपचा उमेदवार कोण राहणार हे मला आता सांगता येणार नाही. शंकर जगताप म्हणून लक्ष्मणराव जगताप यांचे बंधू आहेत. लक्ष्ण जगताप यांच्या पत्नी या दोघांचं नाव त्यांनी पार्टीकडे कळविलं आहे.
कसब्यामध्ये त्या भागातल्या मान्यवरांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यात राष्ट्रवादीकडून भिडकर आणि इतर नावांचा समावेश असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.