परीक्षा फाईल फोटो
उच्च स्तरीय बैठकीत विविध राज्यांनी बारावीची परीक्षा घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्याची मागणी उचलून धरली. नवी दिल्ली, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेशनं, आसाम, महाराष्ट्र आणि मेघालय या राज्यांनी विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं लसीकरण केलं जावं अशी भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करावं, अशी भूमिका मांडली आहे.
रविवारी झालेल्या बैठकीत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली, महाराष्ट्र आणि इतर काही राज्यं वगळता इतर राज्यांनी बारावीची परीक्षा आयोजित करण्यास सहमती दर्शवली मात्र, प्रत्येक राज्यानं वेगवेगळ्या समस्या मांडल्या आहेत. नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी बारावीची परीक्षा आयोजित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचं लसीकरण करावं, यासाठी केंद्र सरकारनं फायजर कंपनीशी बोलावं, अशी सूचना देखील त्यांनी दिली.
प्रातिनिधिक फोटो
उच्चस्तरीय बैठकींनंतर सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. बारावीच्या परीक्षेचं स्वरुप बदलू शकतं, अशी शक्यता आहे. यापूर्वी दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर , हिमाचल प्रदेश,