Air India पुन्हा होणार टाटांच्या मालकीची ! केंद्र सरकारकडून आज होऊ शकते अधिकृत घोषणा
67 वर्षांनंतर एअर इंडिया टाटा पुन्हा घेणार का? या प्रश्नाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी केंद्र सरकार टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्ताब करणार आहे.
1 / 4
या डिलमध्ये एअर इंडियाचे मुंबई आणि दिल्ली स्थित ऑफिसचा देखील समावेश करण्यात आला आहे. सध्या एअर इंडियाच्या मुंबई ऑफिसची किंमत 1,500 करोड रुपये आहे. सध्या एअर इंडिया 4400 देशांर्गत प्लाईट्स आणि 1800 अंतराष्ट्रीय प्लाईट्स कार्यरत आहेत. आणि या सर्वत्रं फ्लाईट पार्किंग स्लॉट देखील एअर इंडियाच संभाळते.
2 / 4
निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 पासून सुरू झाली होती ती कोविड 19 महामारीमुळे स्थगित झाली. सरकारने संभाव्य बोलीदारांना एप्रिल 2021 मध्ये आर्थिक बोली सादर करण्यास सांगितले होते. 15 सप्टेंबर हा निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. टाटा समूह अशा कंपन्यांपैकी एक होता ज्यांनी डिसेंबर 2020 मध्ये एअरलाइन खरेदी करण्यासाठी इंटेलिशन एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) दिला होता.
3 / 4
जर टाटाची बोली यशस्वी झाली, तर टाटा 67 वर्षानंतर एअर इंडियाला परततील. टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली, ज्याचे नंतर एअर इंडिया असे नामकरण करण्यात आले. सरकारने 1953 मध्ये विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले.
4 / 4
2007 मध्ये देशांतर्गत विमान कंपनी इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअरलाइनसाठी यशस्वी बोली लावणाऱ्याला देशांतर्गत विमानतळांवर 4,400 देशांतर्गत आणि 1,800 आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि पार्किंग स्लॉट तसेच परदेशी विमानतळांवर 900 स्लॉटचे नियंत्रण मिळेल. याव्यतिरिक्त कंपनीला एअरलाइनच्या कमी किमतीच्या सेवा एअर इंडिया एक्सप्रेसची 100 टक्के मालकी आणि AISATS ची 50 टक्के मालकी मिळेल.