Winter Health Tips | थंडीच्या दिवसात स्वत:ची काळजी घेण्यासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळ्यात सकस आहार आणि जीवनशैलीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा लवकरच आजारी पडण्याची शक्यता वाढते. या ऋतूत निरोगी राहण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता.

| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 12:01 PM
1 / 5
नियमितपणे हात धुवा - आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या २३ डिसेंबर २०१९च्या अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माहितीयानुसार, ३० टक्के व्यक्ती शौचाला जाऊन आल्यावर अजिबात हात धुवत नाहीत. ज्या ७० टक्के व्यक्ती हात धुतात, त्यातले निम्मे लोक केवळ पाण्यानं हात ओले करतात आणि पुसतात. केवळ २ टक्के व्यक्तींनाच शास्त्रोक्त पद्धतीने हात कसे धुवावेत हे माहीत आहे. या बाबतच्या जनजागृतीसाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'जागतिक हँड वॉशिंग डे' साजरा केला जातो. हात कसे धुवावेत? तर, नळाच्या किंवा पाण्याच्या धारेखाली हात पाण्याने ओले करावेत. पाणी ओतणे बंद करून हात स्वच्छ घासावेत. त्यानंतर किमान २० सेकंद साबण अथवा सॅनिटायझर हातांना चोळावा. साबण हातांना चोळण्याचे आठ टप्पे आहेत. आजारी पडू नये म्हणून जेवण्यापूर्वी किंवा चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा.

नियमितपणे हात धुवा - आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या २३ डिसेंबर २०१९च्या अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माहितीयानुसार, ३० टक्के व्यक्ती शौचाला जाऊन आल्यावर अजिबात हात धुवत नाहीत. ज्या ७० टक्के व्यक्ती हात धुतात, त्यातले निम्मे लोक केवळ पाण्यानं हात ओले करतात आणि पुसतात. केवळ २ टक्के व्यक्तींनाच शास्त्रोक्त पद्धतीने हात कसे धुवावेत हे माहीत आहे. या बाबतच्या जनजागृतीसाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'जागतिक हँड वॉशिंग डे' साजरा केला जातो. हात कसे धुवावेत? तर, नळाच्या किंवा पाण्याच्या धारेखाली हात पाण्याने ओले करावेत. पाणी ओतणे बंद करून हात स्वच्छ घासावेत. त्यानंतर किमान २० सेकंद साबण अथवा सॅनिटायझर हातांना चोळावा. साबण हातांना चोळण्याचे आठ टप्पे आहेत. आजारी पडू नये म्हणून जेवण्यापूर्वी किंवा चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा.

2 / 5
हायड्रेटेड राहा - सहसा हिवाळ्यात, तुमची पाण्याची पातळी कमी होते. थंडीच्या मोसमात आपल्याला तहान लागत नाही म्हणून आपण जास्त पाणी पीत नाही. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. हे आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवते. त्यामुळे तुम्हाला निरोगी राहायचे असले तरी दिवसातून किमान 2 लिटर पाणी प्या.

हायड्रेटेड राहा - सहसा हिवाळ्यात, तुमची पाण्याची पातळी कमी होते. थंडीच्या मोसमात आपल्याला तहान लागत नाही म्हणून आपण जास्त पाणी पीत नाही. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. हे आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवते. त्यामुळे तुम्हाला निरोगी राहायचे असले तरी दिवसातून किमान 2 लिटर पाणी प्या.

3 / 5
वाढत्या वयाबरोबर व्याधीही वाढतात. त्यामुळे सकस आहार महत्वाचा आहे.

वाढत्या वयाबरोबर व्याधीही वाढतात. त्यामुळे सकस आहार महत्वाचा आहे.

4 / 5
पुरेशी झोप घ्या - शरीर आणि मनाच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. निरोगी शरीरासाठी किमान 7 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे. वास्तविक, झोपेत असताना, आपले शरीर मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य ठीक करण्याचे काम करते. या अवस्थेत शरीर सर्व समस्या स्वतःच निराकरण करते.. झोपेच्या कमतरतेमुळे आपल्याला थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. उत्साही राहण्यासाठी दररोज पूरेशी झोप घ्या.

पुरेशी झोप घ्या - शरीर आणि मनाच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. निरोगी शरीरासाठी किमान 7 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे. वास्तविक, झोपेत असताना, आपले शरीर मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य ठीक करण्याचे काम करते. या अवस्थेत शरीर सर्व समस्या स्वतःच निराकरण करते.. झोपेच्या कमतरतेमुळे आपल्याला थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. उत्साही राहण्यासाठी दररोज पूरेशी झोप घ्या.

5 / 5
व्यायाम - केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर स्नायू तयार करण्यासाठीही व्यायाम आवश्यक आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि सर्दीपासून बचाव करण्यास देखील मदत करते. व्यायाम केल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. अशाप्रकारे, ते शरीराला संसर्गाशी अधिक चांगल्या प्रकारे लढण्यास मदत करते.नियमित व्यायाम केल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला, फ्ल्यू यांसारख्या सतत होणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून शरीराचा बचाव साधला जातो. याचबरोबर अशा व्यक्ती कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब, पित्त अशा गंभीर विकारांपासूनही मुक्तता मिळते.

व्यायाम - केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर स्नायू तयार करण्यासाठीही व्यायाम आवश्यक आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि सर्दीपासून बचाव करण्यास देखील मदत करते. व्यायाम केल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. अशाप्रकारे, ते शरीराला संसर्गाशी अधिक चांगल्या प्रकारे लढण्यास मदत करते.नियमित व्यायाम केल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला, फ्ल्यू यांसारख्या सतत होणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून शरीराचा बचाव साधला जातो. याचबरोबर अशा व्यक्ती कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब, पित्त अशा गंभीर विकारांपासूनही मुक्तता मिळते.