कोरोना विषाणू संसर्ग असूनही नागरिकांमधील बेपर्वाई वाढल्याचे चित्र आहे. नागरिक कोरोना संबंधी नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र आहे.
अनलॉक अंतर्गत मुंबई शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचे लक्षात आले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात सध्या 12 हजार 464 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असूनही नागरिकांमधील निष्काळजीपणा वाढत असल्याचं चित्रं आहे.
मुंबईत आतापर्यंत 2 लाख 90 हजार 23 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर आतापर्यंत एकूण 2 लाख 65 हजार 760 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळूनही मुंबईच्या जुहू चौपाटीवर विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे.
मुंबईच्या जुहू चौपाटीवर नागरिकांनी मास्क घातला नसल्याचे समोर आले. मास्क न घालता अनेकजण चौपाटीवर आनंद व्यक्त करताना दिसून आले.
नागरिक कोरोना नियम पाळत नसल्याचे लक्षात आल्यामुळे महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शहरात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली होती.
अनलॉक अंतर्गत मुंबई शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.