सांगलीतील ब्रम्हनाळ (Brahmanal) गावात बचावकार्यादरम्यान बोट उलटून (Boat Overturn) 14 जणांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर ब्रम्हनाळ गावातील नागरिकांचा संताप पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडे मदत मागूनही त्यांनी योजनेअंतर्गत मदत करता येत नसल्याचं कारण पुढे करत बोट नाकारल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांचा रुद्रावतार एका व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संदीप राजोबा हे ब्रह्मनाळ या गावातीलच आहेत. त्यांनीच हा व्हिडीओ शूट केला.
'कृष्णा-वेण्णा नदीच्या संगमावर आजघडीला 30 फूट पाणी आहे. मात्र प्रशासनाची कुठलीही मदत मिळत नाही. 20 ते 22 जणांना नेणारी बोट उलटल्यामुळे पूरग्रस्त पाण्यात बुडाले. नऊ जणांचे मृतदेह सापडले असून त्यामध्ये एका लहान बाळाचा समावेश आहे. तीन ते चार जण पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचंही संदीप राजोबा यांनी सांगितलं.
'आमच्या सरपंचांनी प्रशासनाकडे बोटी मागितल्या. मात्र तुमचं गाव पूरस्थिती योजनेत येत नाही, असं सांगत आम्हाला बोटी नाकारल्या. स्थानिकांनी जीव धोक्यात काईलीतून (मोठी कढई) घालून मृतदेह बाहेर काढले. मात्र अजूनही प्रशासनाने आमची दखल घेतली नाही. हा प्रकार असाच सुरु राहिला, तर आम्ही जलसमाधी घेऊ' असा इशारा गावकऱ्यांनी दिला.
सांगली बोट दुर्घटना