“लवकरात लवकर खटाव तालुका दुष्काळी म्हणून घोषित करा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळेच नक्षलवाद उफळतो आहे. भविष्यात या नक्षलवादाचे मी नेतृत्व करेन”, अशी गर्जना राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. ते साताऱ्यात बोलत होते.