मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष धक्कादायक वळणावर येऊन पोहचला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या आदेशानुसार ठाकरे सरकारला(Thackeray Government) बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. अशात महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेट बैठकांचा धडाका लावला आहे. औरंगाबाद, उस्मानाबाचे नाव अखेर ठाकरे सरकारने बदलले आहे(Aurangabad Renaming). कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारने 10 मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ही बैठक होत आहे. ही मंत्रिमंडळ बैठक वादळी होण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जातेय. या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. औरंगाबाद शहराचे नाव “संभाजीनगर” असं करण्याचा मुद्दा शिवसेनेच्या अजेंड्यावर होता. अखेर प्रत्यक्षात नामांतराचा हा प्रस्ताव मान्य करुन शिवसेनेने मास्टर स्ट्रोक मारला आहे.
ही बैठक सुरु झाली असतानाच अवघ्या दोन मिनिटात काँग्रेसचे दोन मंत्री बैठकीतून बाहेर पडले आहे. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि अस्लम शेख हे मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडल्यानं चर्चेला उधाण आले. मात्र, आपल्या विभागाच्या फाईल घेऊन वर्षा गायकवाड पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाल्या.
मला माझ्याच काहीच लकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती उद्भवली, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी हे विधान केलं आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पाच वर्षे हे सरकार चालणार असे मी म्हणालो होतो, पण माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले.