मुंबई : शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना गटनेते म्हणून विधिमंडळाने मान्यता दिली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा जबरदस्त झटका मानला जात आहे. विधिमंडळांच्या निर्णयामुळे बहुमत चाचणीवर याचा फारसा परिणाम होणार नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे तोच राज्य करेल असे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर(Deepak Kesarkar )यांनी म्हंटले आहे.
विधिमंडळाने एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे अजय चौधरी (Ajay Choudhary) यांची मान्यता रद्द झाली आहे. भरत गोगावले (Bharat Gogawale) हेच शिंदे गटाचे प्रतोद असणार आहेत असेही विधिमंडळाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे.
या निर्णयानंतर ठाकरेंची शिवसेना पुढे काय पावलं उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या सर्व आमदारांची कायदेशीर लढाई कठीण होणार आहे. जर एकनाथ शिंदे यांनी कारवाई करत 16 आमदारांना नोटीस बजावली तर त्या 16 आमदारांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. व्हीपवरूनही मोठा कायदेशील पेच हा उद्धव ठाकरे यांच्याकडील आमदारांसमोर निर्माण होऊ शकतो.
विधिमंडळाने हा निर्णय दिला आहे. एकनाथ शिंदे यांची मागणी देखील विधिमंडळाने कायम ठेवली आहे. गटनेत्याने निर्देश दिल्याशिवाय प्रतोदला वीप काढता येत नाही अन्यथा प्रतोद हेच सर्वात मोठे ठरले असते ते न्यायालयात जाण्याची भीती घालत आहेत. मात्र न्यायालयाने ही स्पष्ट केले आहे की एका विशिष्ट मर्यादे पलीकडे न्यायालय हे विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करत नाही अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच ज्यांच्याकडे हुमत आहे तोच राज्य करेल असेही केसरकर म्हणाले.