सरसंघचालक मशिदीत इस्लाम कबूल करण्यासाठी गेले होते का? सुषमा अंधारेंचा आशिष शेलारांना सवाल

| Updated on: Oct 31, 2022 | 12:03 AM

ठाकरे गट मतांसाठी धर्मांचं राजकारण करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. याच आरोपांना अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सरसंघचालक मशिदीत इस्लाम कबूल करण्यासाठी गेले होते का? सुषमा अंधारेंचा आशिष शेलारांना सवाल
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यातील कलगीतुरा पुन्हा एकदा रंगला आहे. सरसंघचालक मशिदीत इस्लाम कबूल करण्यासाठी गेले होते का? अस प्रश्न उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे. ठाकरे गट मतांसाठी धर्मांचं राजकारण करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. याच आरोपांना अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलार आणि भाजपा द्वेषाचे राजकारण करत आहेत. आम्ही मराठी मुस्लिम उल्लेख केला. त्यावरून शेलराना मिरच्या झोंबल्या अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

आशिष शेलार यांनी भ्रम निर्माण केला आहे. आशिष शेलारांनी सांगावं सरसंघचाकल मस्जिद मध्ये का गेले होते. औरंगजेबाची माफी मागायला गेले होते का? की त्यांच्याशी दोस्ती करायला गेले होते का? इस्लाम कबूल करण्यासाठी गेले होते का? या प्रश्नांची शेलार यांनी उत्तर द्यावीत. सरसंघचालकांना हा प्रश्न विचारन्याची हिंमत दाखवावी असं आव्हान देखील सुषमा अंधारे यांनी शेलार यांना दिले आहे.