धारावीतल्या विद्यार्थी आंदोलनाने फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. हे आंदोलन एवढं आक्रमक होतं की सुरूवातील राज्य सरकारला घाम फुटला. यानंतर राज्यचे पोलीस खातेही खडबडून कामला लागले आणि या आंदोलनामागील शक्ती शोधण्यास सुरूवात झाली. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला दोषी धरत हिंदुस्तानी भाऊला अटक केली. कोर्टाने त्याला तीन दिवसांची कोठडीही सुनावली होती. मात्र आज त्याच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. दरम्यान, Hindustani Bhau ला घेऊन पोलीस नुकते Bandra कोर्टात दाखल झाले आहेत. वांद्रे कोर्टात याप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. त्याला पुन्हा कोठडी होणार की जामीन मिळणार हे थोड्याच वेळात सर्वांना समजेल.