मुंबई : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी ज्या सुनिल शिंदे यांनी वरळीची उमेदवारी सोडली होती, त्यांना आता शिवेसेनेतर्फे विधानपरिषदेला पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर रामदास कदम यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जातंय.