दिवाळीमुळे हळदीला चढला पिवळा रंग, मागणीत वाढ दरात मोठा बदल

| Updated on: Nov 06, 2021 | 1:10 PM

त्पादनवाढीपेक्षा बाजारपेठेतील भाव ही देखील महत्वाची बाब आहे. त्यासाठी शेतकरी वर्गाने नियोजन पद्धतीने शेती करावी किंवा लागवड करावी. अधिकच्या उत्पन्नासाठी नगदी पिकांशिवाय पर्याय नाही. परंतु काही वेळेस हीच नगदी पिके शेतकरी वर्गाला मातीत सुद्धा घालतात. नगदी पिकांमध्ये ऊस, कापूस, हळद, आणि तंबाखू या पिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो.

दिवाळीमुळे हळदीला चढला पिवळा रंग, मागणीत वाढ दरात मोठा बदल
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : उत्पादनवाढीपेक्षा बाजारपेठेतील भाव ही देखील महत्वाची बाब आहे. त्यासाठी शेतकरी वर्गाने नियोजन पद्धतीने शेती करावी किंवा लागवड करावी. (Cash crop) अधिकच्या उत्पन्नासाठी नगदी पिकांशिवाय पर्याय नाही. परंतु काही वेळेस हीच नगदी पिके शेतकरी वर्गाला मातीत सुद्धा घालतात. नगदी पिकांमध्ये ऊस, कापूस, हळद, आणि तंबाखू या पिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. बाजारात या पिकांना भाव सुद्धा योग्य मिळत असतो. मात्र, दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे. (increase in turmeric prices) नव्याने दाखल झालेल्या हळदीला चांगला दर मिळत आहे.

उत्पादनाबरोबरच बाजारपेठेचा अभ्यास देखील आता महत्वाचा ठरत आहे. नगदी पिकांमधून शेतकऱ्यांची आर्थिक बाजू ही सक्षम होते पण त्याचबरोबर योग्य नियोजनही आवश्यक आहे. त्यामुळे योग्य दर नसल्यास शेतीमालाची साठवणूक करण्याची शेतकऱ्यांची क्षमता असणे आवश्यक आहे.

उद्योग प्रक्रिया क्षेत्रात हळदीची मागणी

सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेक पिकांचे तसेच भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामध्ये कोथिंबीर, भाजी, कांदा आणि मसाल्याचे पदार्थ यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.ऐन दिवाळी मध्ये हळदीच्या मागणीत मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे भाव सुद्धा खूप वाढला आहे. दिवाळी मध्ये फराळ आणि उद्योग प्रक्रिया क्षेत्रात हळदीची मागणी वाढल्यामुळे हळदीचा भाव सुद्धा 200 रुपयांपर्यंत वाढलेला आहे.

पावसामुळे झाले होते नुकसान

राज्यातील अनेक बाजार समित्या दिवाळी मध्ये बंद होत्या. परंतु, नांदेड आणि वसमत या बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात 50 ते 100 रुपयांपर्यंत वाढ झालेली होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे खूप नुकसान झाले होते. सतत च्या पडणाऱ्या पावसामुळे हळद उत्पादक क्षेत्रात मूळकूज आणि कीड आणि रोगाने हळदीचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ह्या वर्षी हळद उत्पादनात सुद्धा 15 टक्क्यांपर्यंत घट होणार आहे.

मागणी वाढल्यानंतर हळदीच्या भावात चढ

सणासुदीच्या काळात हळदीची मागनी वाढल्यामुळे दारात सुद्धा बदल झालेले आहेत. मागणी चे प्रमाण वाढल्यामुळे हळदीचे भाव हे 4500 ते 8600 रुपये प्रती क्विंटल एवढे झाले आहेत तसेच तामिळनाडू राज्यात हळदीचे भाव हे 6000 ते 8600 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनाही बाजारपेठेचं ‘गणित’ कळंल, सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा

रब्बीची पेरणी लांबणीवर ; शेतकऱ्यांनो अशी काळजी अन्यथा उत्पादनात होणार घट

एक विमा कंपनी अन् 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धरले वेठीस, कृषी विभागाची थेट केंद्राकडे तक्रार