औरंगाबाद : गरिबी वाईट असं म्हणतात. गरिबीमुळे हक्काच्या अधिकारांसाठी झगडावं लागतं. संघर्ष करावा लागतो. महाराष्ट्रातील एका ग्रामपंचायत कार्यालयात हेच पाहायला मिळालंय. ही बाब औरंगाबादच्या (Aurangabad Viral video) एका गावातील आहे. औरंगाबादमधील गणोरी (Ganori village, Fulambri Taluka) गावातील एक व्हिडीओ सध्या समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये राज्यभरातील आदिवासी समाजात संताप व्यक्त केला जातो आहे. एका सरपंचाच्या पतीने आदिवासी बांधवांना शिविगाळ केली आहे. अर्वाच्य भाषेत शिविगाळ करताना हा व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झालाय. ग्रामपंचायत कार्यलायात पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीत एक व्यक्ती बसला होता. हा व्यक्ती गावातील महिला सरपंचाचा पती असल्याचं सांगितलं जातंय. या व्यक्तीने आदिवासींना शिविगाळ केली. त्यांना उडवाउडवीची उत्तरंही दिली. अरेरावी करत असणाऱ्या या व्यक्तीला आदिवासी बांधवांपैकी एकाने जाब विचारण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. ग्रामपंचायतीत हुकुमशाही चालवता का तुम्ही? तुम्ही सरपंच आहात का? असा प्रश्नही उपस्थित केलाय.
याची बायको सरपंच आहे, पण जणू काही सगळे अधिकार आपल्यालाच आहेत असा यांचा ऑरा आहे, घटना फुलंब्री तालुक्यातली आहे. औरंगाबादमधल्या आदिवासींना कुणी न्याय देणारं आहे का, याच्यावर कुणी कारवाई करण्याची हिंमत दाखवणार आहे का? #Aurangabad #Tribal #Video #maharashtranews pic.twitter.com/OwhFuKxxHi
हे सुद्धा वाचा— Siddhesh Sawant (@ssidsawant) August 30, 2022
ही संतापजनक घटना औरंगबादच्या गणोरी गावात घडली. या गावची सरपंच असलेल्या महिलच्या पतीने आदिवासी नागरिकांना शिविगाळ केली. ग्रामपंचायीत गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या खूर्चीवर बसून ही शिविगाळ करण्यात आल्यानं लोकांनी संताप व्यक्त केला. घरांसाठी जागा मागायला गेलेल्या आदिवासींना ही शिविगाळ करण्यात आली. यावेळी आदिवासी बांधव खाली जमिनीवर बसले असल्याचं दिसून आलंय.
ग्रामपंचायत कारभारात सरपंच पती हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांकडून करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात गणोरी गावामध्ये घडलेल्या या घटनेनं तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. संतोष तांदळे असं शिविगाळ करणाऱ्या सररपंच पतीचं नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच जोपासली का जातेय, असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. शिवाय आदिवासींना समान वागणूक का दिली जात नाही, यावरुनही तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.