मुंबईच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटील आणि माझा संबंध आला नाही. त्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही. मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळेस राजकीय विचार नव्हता, सामाजिक विचार होता. त्यांनी निवडणुका आमच्या सोबत लढवावी यासाठी मी त्यांना फोन करणार नाही. कारण आमचा तो स्वभाव नाही. आता ब्रह्मदेव खाली आला तरी आम्ही निवडणूक लढणारच. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहतो तो आम्ही कायम ठेवणार, असं बच्चू कडू म्हणाले.