ऐश्वर्या राय – सलमान खान याच्या ‘लव्हस्टोरी’मध्ये शाहरुख ठरला व्हिलन; फार कमी लोकांना माहिती असेल ‘हे’ सत्य

| Updated on: Dec 14, 2023 | 4:32 PM

Love Story In Bollywood : शाहरुख खान याच्यासोबत मिळत असलेली प्रसिद्धी आणि सलमान खान याचा रागीट स्वभाव... ऐश्वर्या राय हिचं झालं प्रचंड नुसकान, अनेकांना माहिती नसलेलं सत्य

ऐश्वर्या राय - सलमान खान याच्या लव्हस्टोरीमध्ये शाहरुख ठरला व्हिलन; फार कमी लोकांना माहिती असेल हे सत्य
Follow us on

मुंबई | 14 डिसेंबर 2023 : एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील फक्त आणि फक्त अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. असंख्य वाद झाल्यानंतर ऐश्वर्या – सलमान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता दोघे त्यांच्या खासगी आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण तरी देखील दोघांच्या भूतकाळाच्या गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या – सलमान यांचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. रिपोर्टनुसार, अभिनेता शाहरुख खान याच्यामुळे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं ब्रेकअप झालं असं अनेकदा समोर आलं. यामागचं सत्य फार कमी लोकांना माहिती आहे.

सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘हम दिल दे चुके समन’ सिनेमाच्या सेटवर दोघांच्या नात्याची सुरुवात झाली… ही गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे. तेव्हा आयुष्यभर एकत्र राहायचं असं वचन देखील ऐश्वर्या – सलमान यांनी एकमेकांना दिलं असल्याची माहिती समोर आली होती. अनेक वर्ष ऐश्वर्या – सलमान एकत्र होते. पण या नात्याचा अंत फार वाईट होता.

रिपोर्टनुसार सलमान खान – ऐश्वर्या राय लव्हस्टोरीमध्ये अभिनेता शाहरुख खान व्हिलन ठरला. सलमान खान अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासाठी फार पझेसिव्ह होता. याच दरम्यान, रिल लाईफमध्ये शाहरुख खान आणि ऐश्वर्या यांची जोडी हीट ठरली होती. ‘मोहब्बतें’ आणि ‘देवदास’ यांसारख्या सुपटहीट सिनेमे शाहरुख – ऐश्वर्या यांनी बॉलिवूडला दिले.

हे सुद्धा वाचा

शाहरुख – ऐश्वर्या यांच्या जोडीला मिळत असलेलं चाहत्यांचं प्रेम, लोकप्रियता सलमान याला कुठेतरी खटकत होती. एकदा ‘चलते – चलते’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना सलमान खान सेटवर आला. सिनेमात ऐश्वर्या असल्यामुळे सलमान खान सतत सेटवर येवू लागला होता. सेटवर अनेकदा ऐश्वर्या आणि सलमान यांच्यात भांडणं देखील झाली. तेव्हा दोघांना समजवण्याचा प्रयत्न शाहरुख याने केला.,

याप्रकरणाचे ऐश्वर्या हिच्या प्रोफेशनल आयुष्यावर फार मोठे परिणाम झाले. ‘चलते चलते’ सिनेमातून ऐश्वर्या हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तेव्हा सलमान खान याच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय ऐश्वर्या हिने घेतला. यानंतर सलमान खान अभिनेत्रीच्या घरी पोहोचला. सलमान जवळपास रात्री 3 वाजेपर्यंत ऐश्वर्या हिच्या घराबाहेर होता. पण अभिनेत्रीने दरवाजा उघडला नाही आणि येथे सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्या ‘लव्हस्टोरी’चा अंत झाला.