कोण बरोबर?, कोण चूक? हा विषय…जवळच्या मित्र राष्ट्राबद्दल भारताची अचानक कठोर भूमिका

| Updated on: Mar 28, 2024 | 1:19 PM

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) नुकताच एक प्रस्ताव मंजूर झाला. त्याचवेळी जयशंकर यांनी हे विधान केलं. एस जयशंकर सिंगापूर, फिलिपींस आणि मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. संपूर्ण वादात कोण बरोबर?, कोण चूक? हा विषय वेगळा आहे.

कोण बरोबर?, कोण चूक? हा विषय...जवळच्या मित्र राष्ट्राबद्दल भारताची अचानक कठोर भूमिका
indias External Affairs minister s jaishankar
Follow us on

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मलेशिया दौऱ्यावर आहेत. त्यांनी इस्रायल-पॅलेस्टाइन मुद्यावर एक मोठ वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी इस्रायलवर टीका केली. पॅलेस्टाइनच्या नागरिकांच जे नुकसान झालय, त्यावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “इस्रायल-पॅलेस्टाइनच्या संपूर्ण वादात कोण बरोबर?, कोण चूक? हा विषय वेगळा आहे. पण तथ्य हेच आहे की, पॅलेस्टाइनला त्यांचे अधिकार आणि जमिनीपासून वंचित ठेवण्यात येतय” असं एस जयशंकर म्हणाले.
7 ऑक्टोबरला हमासने जे केलं, तो दहशतवादी हल्लाच होता, असं जयशकंर यांनी म्हटलं आहे.

गाजामध्ये इस्रायलकडून जे सुरु आहे, त्याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) नुकताच एक प्रस्ताव मंजूर झाला. त्याचवेळी जयशंकर यांनी हे विधान केलं. गाजामध्ये तात्काळ शस्त्रसंधी लागू करावी हा प्रस्ताव मंजूर झालाय. अमेरिकेने या प्रस्तावावर आपला वीटो वापरला नाही. मतदानापासून लांब राहिले. त्यावर इस्रायलने नाराजी व्यक्त केली.

अल-अक्सा फ्लड ऑपरेशनला उत्तर

एस जयशंकर सिंगापूर, फिलिपींस आणि मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. फिलिपींसचा दौरा करुन ते मलेशियामध्ये पोहोचले आहेत. कोलमपुरमध्ये एका इवेंटमध्ये बोलतान ते म्हणाले की, 7 ऑक्टोबरला जे झालं, तो दहशतवादच होता. पण दुसऱ्याबाजूला निरपराध नागरिकांचा मृत्यू मान्य नसल्याच त्यांनी सांगितलं. हमासने इस्रायल विरुद्ध अल-अक्सा फ्लड ऑपरेशन लॉन्च केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल मागच्या पाच महिन्यांपासून गाजावर हल्ले करत आहे. त्यामुळे गाजामध्ये मानवी संकट निर्माण झालं आहे. या हल्ल्यात जवळपास 35 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाजामधील 75 टक्के स्ट्रक्चर उद्धवस्त झालं आहे.