India-China Relation : भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर ‘या’ देशाने थेट चीनला दिली धमकी

| Updated on: Mar 30, 2024 | 10:21 AM

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नुकताच एका देशाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्या देशाला बळ मिळालय. त्यांनी थेट चीनला धमकी दिली आहे. आम्ही आमच्या शत्रुंविरोधात कारवाई करु असं त्या देशाच्या राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

India-China Relation : भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर या देशाने थेट चीनला दिली धमकी
South China Sea
Follow us on

दक्षिण चीन सागराच्या हद्दीवरुन अनेक दशकापासून फिलीपीन्स आणि चीनमध्ये वाद आहे. आता हा वाद वाढत चालला आहे. दक्षिण चीनच्या समुद्रात फिलीपीन्सच जहाज आणि चिनी तट रक्षक दलामध्ये झडप झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शाब्दीक युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. फिलीपीन्स, वियतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई या नैसर्गिक साधन संपत्तीने समुद्ध असलेल्या व्यस्त जलमार्गावर चीन नेहमीच आपला दावा सांगत आलाय. नुकताच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फिलीपीन्सचा दौरा केला. दक्षिण चीन सागरी वादात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं भारताने फिलीपीन्सला सांगितलं. चिनी तट रक्षक दलाच्या हल्ल्यानंतर फिलीपीन्सच्या राष्ट्रपतींनी गुरुवारी भूमिका जाहीर केली. दक्षिण चीन सागरात चिनी तट रक्षक दल आणि मिलिशिया जहाजांच्या हल्ल्याविरोधात कारवाई करु. फिलीपीनी झुकत नाहीत असही त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस यांनी पुढच्या काही आठवड्यात सरकार काय करावाई करणार? त्या बद्दल माहिती दिलेली नाही. पण आम्ही आमच्या शत्रुंविरोधात कारवाई करु असं त्यांनी म्हटलं आहे. चिनी तट रक्षक दल आणि फिलीपीन्सच्या जहाजामध्ये समुद्रात संघर्ष झाला. “चिनी तट रक्षक दल आणि चिनी समुद्री मिलिशिया एजंटचे हल्ले चुकीचे आहेत. आम्ही या खतरनाक हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ” असं मार्कोस यांनी एक्सवर लिहिलय. “आम्हाला कुठल्याही देशासोबत वाद नकोय. खासकरुन आमचे मित्र असल्याचा दावा करणाऱ्या देशांसोबत संघर्ष करायचा नाहीय. पण आम्ही गप्प बसणार नाही. फिलीपीनी झुकणार नाहीत” असं त्यांनी म्हटलं आहे.


जयशंकर यांच्या दौऱ्यानंतर धमकी

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकताच फिलीपीन्सचा दौरा केला. या धमकीला जयशंकर यांच्या दौऱ्याशी जोडल जात आहे. कारण राष्ट्रपति फर्डिनेंड मार्कोस यांनी हे वक्तव्य जयशंकर यांच्या दौऱ्यानंतर केलं. फिलीपीन्स सारखाच भारताचा चीनसोबत LAC वर वाद सुरु आहे.