नवी दिल्ली : भारताचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी काश्मीरबाबत मोठे वक्तव्य केलं आहे (Army Chief on PoK). पाकव्याप्त काश्मीरसह (POK) संपूर्ण जम्मू-काश्मीर भारतचा आहे. सरकारने आदेश दिल्यास भारतीय सैन्य पीओकेवरही नियंत्रण मिळवले, असं मत लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केलं (Army Chief on PoK). नरवणे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी इतरही अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका सांगितली.
मनोज नरवणे म्हणाले, “जम्मू काश्मीरमध्ये सर्वांनीच चांगलं काम केलं आहे. तेथील लोक खूपच सहकार्य करणारे आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस आणि स्थानिक प्रशासन देखील भरपूर सहकार्य करते. संसदेच्या ठरावानुसार पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण जम्मू काश्मीर भारताचा भाग आहे. जर संसदेने इच्छा व्यक्त केली आणि सरकारने आदेश दिला तर पाकिस्तानच्या नियंत्रणातील काश्मीरवर देखील आम्ही नियंत्रण मिळवू. यासाठी भारतीय सैन्य योग्य ती पाऊले उचलेल.”
नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय सैन्य अधिक सक्रिय आहे. आपल्याला दररोज गुप्त माहिती आणि अलर्ट मिळत असतात. या माहितीला आपण गांभीर्याने घेत योग्य ती पाऊलं उचलतो. या सतर्कतेमुळेच आपण दहशतवादी घातपाताच्या कारवाईंना रोखण्यात यशस्व ठरतो.”
लष्कर प्रमुखांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :