शिर्डी: कोरोना संकटात अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर गंडांतर आलं. मात्र, अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स, ग्रंथालयं सुरु करण्यात आली आहेत. पण मंगल कार्यालयं आणि लॉन्स सुरु करण्यास राज्य सरकारनं अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळं एका लग्नावर अवलंबून असलेले समाजालातील जवळपास 24 घटक सध्या उपासमारीचा सामना करत आहेत. त्यात मंगलसेवा, वाजंत्री, ऑर्केस्ट्रा, फोटोग्राफर, डेकोरेटर्स अशा अनेकांचा समावेश आहे. (Demand to starts weddings halls in state )
मंगल कार्यालयावर अवलंबून असलेल्या २४ घटकांची आज संगमनेरमध्ये बसंत लॉन्स इथं राज्यव्यापी बैठक पार पडली. राज्य सरकारनं मंगल कार्यालयं आणि लॉन्सवरील निर्बंध उठवले नाहीत तर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अनलॉकमध्ये लग्न कार्याला ५० ऐवजी 500 ते 1000 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे. सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या:
अनलॉकनंतर 7 महिन्यांनी मोनोरेल पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत
Demand to starts weddings halls in state