Food | भारतीय आहारात पूर्णान्न ‘खिचडी’ला विशेष महत्त्व, वाचा खिचडी खाण्याचे फायदे!

| Updated on: Nov 03, 2020 | 4:31 PM

पचनास हलकी असणारी ‘खिचडी’ इतर ऋतूंप्रमाणेच हिवाळ्याच्या काळातही पोटासाठी लाभदायक ठरते.

Food | भारतीय आहारात पूर्णान्न ‘खिचडी’ला विशेष महत्त्व, वाचा खिचडी खाण्याचे फायदे!
Follow us on

मुंबई : खिचडी ही भारतातील लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. भारतीय लोक डाळ व तांदूळ एकत्र करून आणि त्यात तूप, भाज्या आणि मसाले वगैरे घालून ‘खिचडी’ (Indian Whole meal Khichadi) बनवतात. हिवाळ्याच्या ऋतूत हवामानात बरेच बदल होतात. हवामानाप्रमाणेच आपल्या शरीरात आणि जीवनशैलीत देखील बदल घडत असतात. अशा परिस्थितीत आपल्याला हिवाळ्याच्या काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलल्या पाहिजेत. पचनास हलकी असणारी ‘खिचडी’ इतर ऋतूंप्रमाणेच हिवाळ्याच्या काळातही पोटासाठी लाभदायक ठरते. हिवाळ्याच्या हंगामात खिचडी खाण्याचे अनेक फायदे होतात.(Indian Whole meal Khichadi good for health)

भारतात बनवल्या जाणऱ्या खिचडीमध्ये कर्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे, पाणी आणि फायबर सारख्या बर्‍याच पौष्टिक पदार्थांचा समावेश केला जातो. भारतीय खिचडी दही, पापड, तूप आणि लोणचे इत्यादींसह दिले जातात. जर, खिचडी बरोबर दही, पापड, तूप आणि लोणचे असेल, तर ती अधिकच स्वादिष्ट लागते.

खिचडीचे फायदे

पौष्टिक पूर्णान्न असणारी खिचडी पोटासाठीही लाभदायक असते. खिचडी खाल्ल्याने अपचनाचा त्रास कमी होतो. जर, वजन कमी करायचे असेल तर, खिचडी खाणे उपयुक्त ठरते. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील खिचडी लाभदायक ठरते. खिचडी वात, पित्ता आणि कफापासून बचाव करण्यासाठीही मदत करते. याशिवाय खिचडी खाल्ल्याने शरीरातील डिटॉक्सही दूर होतो.(Indian Whole meal Khichadi good for health)

खिचडीचे प्रकार

‘खिचडी’ असे नुसते उच्चारले तरी अनेक प्रकारच्या खिचडी आपल्या डोळ्यांसमोर तरळतात. भारतात खिचडीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ‘मुग डाळ खिचडी’, ‘तूर डाळ खिचडी’, ‘संपूर्ण धान्य खिचडी’, ‘आयुर्वेद खिचडी’, ‘मसालेदार खिचडी’, ‘ड्रायफ्रूट खिचडी’, ‘बाजरीची खिचडी’ आणि ‘दही खिचडी’ हे पूर्णान्न खिचडीचे महत्त्वाचे प्रकार आहेत.(Indian Whole meal Khichadi good for health)

हिवाळ्यातही लाभदायक

हिवाळ्याच्या मौसमात बऱ्याच जणांना अपचनाची समस्या होते. जर, वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास ‘खिचडी’ खाणे फादेशीर ठरते. हिवाळ्याच्या हंगामात खिचडी पाचन तंत्राला बळकट करते. जर, तुम्ही उन्हाळ्यात खिचडी खात असाल तर, त्या बरोबर दही आवश्य खावे. दररोज वेगवेगळ्या डाळींची आणि सोयाबीनची खिचडी खाल्ल्याने याचा फायदा होतो.

आजारपणात बळ देणारे ‘पूर्णान्न’

अनेक लोकांना हिवाळी हंगामात थंडी, कफ, ताप, अशक्तपणा  अशा तक्रार उद्भवत असतात. अशा आजारपणात अन्न खाणेदेखील कठीण होते. त्यावेळी नरम, मऊसूत खिचडी शरीराला बळ देते. यामुळे, आपल्याला त्वरीत बरे वाटायला लागते आणि शरीरात ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते. वर्षाच्या कुठल्याही ऋतूत, कोणत्याही महिन्यात अगदी झटपट शिजणार आणि पचनास हलकी असणारी ‘खिचडी’ खऱ्या अर्थाने पूर्णान्न ठरते.

(Indian Whole meal Khichadi good for health)