नवी दिल्ली : “मुंबईतील आझाद मैदानावर देशाचे तुकडे करण्याची घोषणा देणाऱ्यांना सरकार खपवून घेत आहेत. मात्र अशा लोकांवर कारवाई झाली नाही, तर सरकारविरोधात आम्ही कडक भूमिका घेऊ, असा इशारा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Sharjeel Imam) यांनी दिला. ते राजधानी दिल्लीत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Devendra Fadnavis on Sharjeel Imam)
मतांच्या राजकारणासाठी काहीही खपवून घेऊ नका. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझी अपेक्षा नाही. पण मी अपेक्षा करतो की उद्धवजी यावर कारवाई करतील. तसे न झाल्यास देश तुम्हाला माफ करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन, आझाद मैदानातील आंदोलक हे देशद्रोहाचा गुन्हा असलेल्या शरजील इमामच्या बाजूने घोषणा देत असल्याचा दावा केला आहे. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले, “आझाद मैदानावरची घटना गंभीर आहे. ‘शरजील तेरे सपने पुरे होंगे’ हे मुंबईत बोललं जात आहे. कोणंय हा शरजील? देशाचे तुकडे करण्याची घोषणा देणाऱ्यांना सरकार खपवून घेतंय. आता काहीही केलं तरी यांना भीती राहिली नाही कारण हे सरकार असंच आहे”.
मतांच्या राजकारणासाठी काहीही खपवून घेऊ नका.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझी अपेक्षा नाही.
पण मी अपेक्षा करतो की उद्धवजी यावर कारवाई करतील.
तसे न झाल्यास देश तुम्हाला माफ करणार नाही !#Mumbai #ANTINATIONAL pic.twitter.com/PPqX1oj7Yr— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 3, 2020
केवळ मतांच्या राजकारणासाठी देशविरोधातील नारे खपवून घेणार असतील तर मग लोक माफ करणार नाहीत. विचारांमध्ये भिन्नता असू शकते, पण देशासोबत कोणतंही विरोधी विधान खपवून घेतलं जाणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून नाही. त्यांना केवळ मतांचं राजकारण करायचं आहे. या सरकारमुळे अशा लोकांच्या मनातली भीती राहिली नाही. काहीही केलं तरी चालतं असा यांचा समज झाला आहे. कारवाई झाली नाही तर मग सरकारविरोधात आम्ही कडक भूमिका घेऊ, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
संबंधित बातम्या
6 राज्यांच्या पोलिसांचा शोध संपला, जेएनयू स्कॉलर शरजील इमामला अखेर अटक