भूक हिंदूंनाही लागते, सुषमा अंधारे असं का म्हणाल्यात

| Updated on: Nov 20, 2022 | 6:44 PM

नोकरी हिंदूंनासुद्धा लागते. हिंदूंच्या माताभगिनी असुरक्षित आहेत.

भूक हिंदूंनाही लागते, सुषमा अंधारे असं का म्हणाल्यात
सुषमा अंधारे
Follow us on

औरंगाबाद : महागाई कमी का होत नाही. याच उत्तर भाजपनं द्यावं. भ्रष्टाचारावर किरीट सोमय्या बोलतात. ईडीच्या नोटिसी दाखवत आरोप केले होते. त्यात प्रताप जाधव, यशवंत जाधव, भावना गवळी, राधाकृष्ण विखे पाटील होते. यांच्यापैकी कुणावरतरी ईडीचे आरोपपत्र दाखल होणार आहे का. भावनिक मुद्दे करण्यापेक्षा लोकाभिमुख मुद्द्यांवर राजकारण करण्यास शिकणार आहात का, असा सवालही सुषमा अंधारे यांनी भाजपला विचारला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, चलनी नोटांना जगात प्रतिष्ठा मिळणार का. यासाठी भाजपनं काय केलं आहे. कोणताही प्रश्न विचारला की, तो धर्मावर आणून ठेवणं हे भाजपचं कसब आहे. पण, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांना हे समजलं पाहिजे की, भूक हिंदुंना सुद्धा लागते. नोकरी हिंदूंनासुद्धा लागते. हिंदूंच्या माताभगिनी असुरक्षित आहेत. महिला सुरक्षा, महागाई यावर भाजपनं कोणतं पाऊलं उचललं.

उपमुख्यमंत्री टोलवाटोलवीची उत्तरं देतात. महत्त्वाची खाती ही उपमुख्यमंत्र्यांकडंच आहेत. मुख्यमंत्री नावालाचं आहेत. त्यांना पोजीशन मिळाली पण, पॉवर नाही. पॉवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहे, तर पोजीशन ही एकनाथ शिंदे यांच्याकडं आहे. त्यामुळं ज्यांच्याकडं पॉवर गेम आहे आम्ही त्यांनाचं प्रश्न विचारणार, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

सरकार स्थापन होऊन शंभर दिवस झालेत. धोरणात्मक निर्णय काय घेतला. जे निर्णय घेतले हे लोकप्रीय आहेत. आम्ही एका फोनवर काम करू शकतो. आम्ही आनंदाचा शिधा वाटतो. असं करून राज्याचे प्रश्न सुटत नाहीत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात.