मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने पोलिसांच्या पदोन्नतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णायामुळे पोलीस दलातील तब्बल 45 हजार पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना थेट फायदा होणार आहे. तसेच पोलीस शिपायांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त होण्याची संधी मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर घेण्यात आलेल्या पदोन्नतीच्या या निर्णयामुळे पोलीस दलात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
राज्य सरकारने पदोन्नती संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे अंमलदारास कमी कालावधीत अधिकारी पदावरुन निवृत्त होता येईल. या नव्या निर्णयामुळे अधिकारी दर्जाच्या पोलिसांची संख्या वाढेल. तसेच पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशा तपासी अंमलदारांच्या संख्येमध्येही वाढ होईल. या निर्णयामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरिकांची मदत घेण्यात अधिक सुलभता येऊन पोलीस दलाचे मनोबल वाढेल. यामुळे गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये निश्चितच भरीव वाढ होईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.
राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या संदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 14, 2021
पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा काही महिन्यात सुमारे ४५ हजार हवालदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना होणार असून विजयादशमीच्या मुहूर्तावर या बातमीमुळे हजारो अंमलदारांच्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होणार आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 14, 2021
या निर्णयामुळे गुन्हयांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरिकांची मदत घेण्यात अधिक सुलभता येऊन पोलीस दलाचे मनोबल वाढेल. पोलीस दलात २.८७ पटीने मानवी दिवसामध्ये वाढ होईल. गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये निश्चितच भरीव वाढ होईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 14, 2021
सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता पोलीस शिपायांना आपल्या 35 वर्षाच्या कार्यकालात पोलीस उपनिरीक्षक या पदावरुन सेवानिवृत्त होता येईल. पोलीस शिपायांना आपल्या सेवाकाळात बारा ते पंधरा वर्षानंतर पदोन्नती मिळते. पदोन्नतीसाठी एवढा जास्त कालावधी लागत असल्यामुळे पोलिसांमध्ये काहीशी नाराजी दिसून येते. मात्र, या नव्या निर्णयामुळे पोलिसांत नवी स्फूर्ती येईल.
पोलीस अंमलदारांना शिपाई, नाईक, हलालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशी पदोन्नती मिळते. एका पदावर दहा वर्षे सेवा दिल्यानंतर नियमानुसार पदोन्नती मिळायला पाहिजे. पण वरच्या पातळीवर पदसंख्या कमी असते. त्यामुळे पदोन्नतीसाठी मोठा कालावधी लागतो. याच कारणामुळे अनेकजण सहाय्यक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरूनच निवृत्त होतात. पण नव्या निर्णयामुळे पोलिसांना लवकर पदोन्नती मिळणार आहे.
इतर बातम्या :
जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये, गुलाबराव पाटलांनी मनसेला फटकारलं
जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि सुटकेची बातमी गुप्त का राहिली?, बातमी कशी फुटली?; वाचा सविस्तर
पंचांच्या निर्णयाआधीच पव्हेलियनकडे परतणारी पूनम राऊत म्हणते, ‘हा खेळ आहे, युद्ध नाही’#INDWvsAUSW #PinkBallTest #indwvausw #PunamRauthttps://t.co/eLFI4YFJ2q
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2021