पुढील तीन ते चार दिवस पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह विदर्भामध्ये जोरदार पाऊस कोसळणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोकणातील किनारपट्टीवर पुन्हा तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातीलही काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.