आज शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2022 जाणून घेणार आहोत राज्यात दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी. राज्याच्या काही भागात जरी पावसाने उघडीप दिली असली तर देखील अद्यापही काही भागात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे नदी नल्यांना पूर आला आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे आज काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी देखील घडण्याची शक्यता आहे. डायघर येथील रस्ता रुंदीकरणादरम्यान रिकामी करण्यात आलेल्या पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.