आज दिनांक 7 ऑगस्ट आपण जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून, कालपासून विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरांमळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं हजारो हक्टरवरील पिके पाण्याखाली गेली अनेकांना आपलं घर सोडावं लागलं. तर पावसाळ्यात होणाऱ्या अपघातामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. मात्र आता पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यात एडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
विजांच्या कडकडाटासह इगतपुरीसह तालुक्यात काही भागात मुसळधार पावसाला सुरवात
हवामान खात्याने सुद्धा वर्तविला होता पावसाचा अंदाज
गेल्या एक तासापासून जोरदार हवेसह पावसाचा तडाखा कायम
पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंताग्रस्त
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उद्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार,
– प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करून निवडणुका वेळेत घेण्यात याव्यात, राष्ट्रवादीची मागणी,
– शिवाय निर्णय बदलल्यामुळे एक हजार कोटींचा खर्च शिंदे फडणवीस यांच्याकडून वसूल करण्याची प्रशांत जगतापांची मागणी
नीती आयोगाच्या बैठकीत जनहिताच्या निर्णयावर चर्चा झाली. कृषी विभागात बदल घडवण्यावर चर्चा केली. पडिक जमीन बागायती शेतीत कशी रुपांतरीत होईल याकडे लक्ष देत आहोत. चार लाख हेक्टरवर पडीक जमीन बागायती करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. ऑर्गेनिक शेती, नैसर्गिक शेतीकडे लोकांचा ओढा कसा वाढेल यावरही चर्चा करण्यात आली
तेलाची निर्मिती आपल्या देशात झाली तर एक लाख कोटीचं तेल आयात करावं लागणार नाही. बळीराजा सुखी झाला पाहिजे त्यावर चर्चा झाली.
२०१५चे एमआयडीसचे नियम कायम आहे. किंमती वाढल्या पण नियम कायम आहे. त्याच्या मानदंडावर पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे
जलयुक्त शिवाराचा डाळी , कडधान्यासाठी फायदा झाला. जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरणारी आहे. त्याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे
शिक्षणावरही आपण काम करत आहोत. शिक्षकांचं योगदान आहे. आमचे गुरुजी ही संकल्पना शाळेत राबवणार आहोत. जे शिक्षक शिकवतात त्यांचे फोटे शाळेत लावणार आहोत. एक शिक्षक शाळा असता कामा नये. यावर चर्चा झाली. शाळाचं डिजिटलायझेशन करण्यावर चर्चा झाली. शिक्षणाचं अपग्रेडेशन करण्यावरही चर्चा केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चा केली.
नगरसेवकांच्या घरासमोरील रस्त्यांवर पडलेले खड्डे परिसरातील नागरिकांनी स्वखर्चाने बुजवले,
परभणी शहरात रस्त्यांचे हाल ,
शहरातील युसूफ कॉलोनी परिसरात नागरिक लोकसहभागातून रस्त्यांची करत आहेत डागडुजी,
एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुक्ताईनगर येथे मेळावा सुरू
मोठ्या संख्येने जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित
एकनाथ खडसे आमदार झाल्यावर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा अधिकृत मेळावा
साडेतीनच्या सुमारास परभणी शहरात चांगल्या पावसाला सुरुवात,
जिल्ह्यातील सेलू मानवत पाथरी सह अनेक भागात होत आहे चांगला पाऊस,
होत असलेला पाऊस पिकांसाठी प्रचंड उपयुक्त मानला जातोय.
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस
मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर
पुरामुळे सेनगाव तालुक्यातील वटकळीसह सात ते आठ गावांचा संपर्क तुटला
उद्या शिंदे गट, शिवसेनेला निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करावे लागणार?
कोर्टाच्या आदेशानुसार शिवसेना वकिलांमार्फत निवडणूक आयोगाची प्रक्रीया पार पडणार
8 तारखेपर्यंत पुरावे सादर करा असे निवडणूक आयोगाचे आदेश
मात्र सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित, कोणताही मोठा निर्णय घेऊ नका कोर्टाचे आयोगाला आदेश
शिवसेना वकिलांमार्फत उद्या निवडणूक आयोगाला पुरावे सादर करण्याची शक्यता
टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सुत्रांची माहिती
मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन
खड्ड्यांमध्ये गवत लावून केले आंदोलन
काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून महामार्ग प्रशासनाचा निषेध
वालीव पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या कमी होताना दिसत नाहीये, आता नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. ते उद्या शिवसेनेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कराड पाटण तालुक्यात सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस
मुसळधार पाऊस नसल्याने पिकांना पावसाचा फायदा
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर तालुक्यात पाऊस
मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार?
सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी
खात्रीलायक सुत्रांची माहिती
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस
जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा सर्कलमध्ये अतिवृष्टी
मेसदा गावातील अनेक घरात शिरले पावसाचे पाणी
पावसाचा पिकांना मोठा फटका
तलाठी मंडळ,अधिकारी यांच्याकडून नुकसानीची पाहणी
शिंदे गटाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबदमध्ये शिवसेनेला हा धक्का बसला आहे. पक्षाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत शिवसेनेने आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडील महानगप्रमुख हे पद काढून घेतले होते. मात्र पुन्हा एकदा शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल यांची औरंगाबादच्या महानगप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
आम्ही आता परत कधी ठाकरेंच्या दारात जाणार नाही
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
आमच्यासोबत यायचं असेल तर या आम्ही नाही म्हणाण नाही – दानवे
आमच्यासोबत राहा पण सरकारमध्ये अडथळा आणू नका – दानवे
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही आणि शत्रूही नाही – दानवे
25 वर्ष आम्ही युती केली त्यांना वाटलं आपलं नुकसान झालंय त्यामुळे त्यांनी साथ सोडली
आम्ही आता नवीन मित्र जोडले, एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच मुळची शिवसेना – दानवे
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून दमदार पाऊस झाल्याने बोरी मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने बोरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बोरी नदीला पूर आला असून, प्रशासनाच्या वतीने बोरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पारोळा तालुक्यातील करंजी गावात 78 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे गावातील 44 घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
रावसाहेब दानवे लाईव्ह
वंचित बहुजन आघाडीकडून आरेमध्ये आंदोलनाला सुरुवात
वंचितचा मेट्रो कारशेडला विरोध
शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
आपकडूनही आरेत आंदोलन
कार्यकर्त्यांनी बांधली झालाडा राखी
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र
विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका पार पडणार
हडपसर विधानसभा मतदारसंघात आज मनसे शहर कोअर कमिटीची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर निवडणुकांच्या तयारीला सुरुवात
कर्जत येथील प्रतीक पवार हल्ल्याप्रकरणी मिराजगाव बंद
घटनेच्या निषेधार्थ मिराजगावमध्ये कडकडीत बंद
प्रतीक पवार हल्ल्याप्रकरणात सहा आरोपींना अटक
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी योगेश देसाई यांची फेरनिवड
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्णय
ते दोनदा पालखी सोहळा प्रमुख देखील होते
योगेश देसाई हे पुण्यातील प्रसिद्ध देसाई आंबेवले या पेढीचे मालक आहेत
दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
राजाराम बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली
धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
सध्या शहर आणि परिसरात पावसाची उघडीप
धरण क्षेत्रातही पावसाची विश्रांती
राधानगरी धरणात 77 टक्के पाणीसाठा
रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाच्या कोसळधारा
रत्नागिरी शहरात तब्बल 12 तासांपासून पावसाची संततधार सुरूच
किनारपट्टी भागात वेगवान वारे
हवामान खात्याकडून कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस
नद्यांच्या पाणीपातळी वाढ
सोलापुरात शोषखड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथील घटना
राजेश्वरी घोडले असे मृत चिमुकलीचे नाव
घराशेजारच्या शेतात घेतलेल्या शोषखड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू
चिमुकलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ
शिंदे समर्थक खासदार संजय मंडलिक यांच्या घरावरील शिवसेनेचा मोर्चा रद्द
सोमवारी काढण्यात येणार होता मोर्चा, आता गुरुवारी काढणार मोर्चा
मोहरममुळे मोर्चाला स्थगिती
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोर्चाला स्थगिती
अमित ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस
अमित ठाकरे आज निफाड, मालेगावला देणार भेट
मनवीसेच्या अभियानाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
आमगाव तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचे छापे
तीन महिलांसह 13 जणांना अटक
पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाब दणाणले
नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आला असून, तीन सदस्य प्रभाग रचना रद्द करून चार सदस्य प्रभाग रचना केल्याने नागपूर महानगरपालिकीची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेकांना दिलासा मिळाला आहे. तीन सदस्य प्रभाग रचनेत भाजप आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा चार वार्डची प्रभाग रचना करण्यात आल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
धुळे बसस्थानकात बस चालकाची आत्महत्या
पुणे – धुळे बसमध्ये घंटी वाजवायच्या दोरीरे घेतला गळफास
हिरामण देवरे असं या बसचालकाचे नाव
आत्महत्येच्या प्रकाराने खळबळ