आज दिनांक 17 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या राज्यात वेदांतावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आज देखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्याच्या अनेक भागात सध्या पाऊस सुरू आहे. इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे.