मुंडके छाटण्याची भाषा नको, भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या; संजय राऊत यांचं उदयनराजेंना आव्हान

| Updated on: Dec 02, 2022 | 6:19 PM

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न गाजतोय. कर्नाटकच्या सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहीलं.

मुंडके छाटण्याची भाषा नको, भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या; संजय राऊत यांचं उदयनराजेंना आव्हान
संजय राऊत
Follow us on

नाशिक – उदयनराजे भोसले यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. त्या भावनांचा स्फोट उदयनराजे यांच्या वाणीतून होत असतो. ते सातारच्या गादीचे छत्रपती आहेत. त्यांच्या मनातून चिड बाहेर येणं स्वाभाविक आहे. त्यांनी मुंडक छाटण्याची भाषा न करता आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. भाजपनं आमच्या दैवताचा आपमान केला आहे. उलट त्यांचं समर्थन केलं जातं. अशावेळी त्या पक्षात राहणं योग्य नाही, असं मला वाटतं, असं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न गाजतोय. कर्नाटकच्या सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहीलं. तिथं महाराष्ट्रातील मंत्र्यांना पाठवू नका. असं त्यांच म्हणणं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले, सीमाप्रश्नावर दोन्ही राज्यात लढाया झाल्या. शाब्दिक वाद झाले.

तीन महिन्यापासून कर्नाटक सरकारमध्ये हिंमत आली कशी. बेळगाववासीयांची गाऱ्हांनी ऐकायला जाऊ, असं ते म्हणतात. राज्यातील क्रांतिकारी सरकार काय करतं. जनतेनं यांची क्रांती स्वीकारली का. बेळगावात तुम्हाला पाय ठेवू दिलं जात नाही.

संजय राऊत म्हणाले, आम्ही जाऊ. अत्यंत हतबल, लाचार सरकार राज्यात आहे. हे काहीही करू शकणार नाही. महाराष्ट्रानं दोन समन्वयक मंत्री नेमले आहेत. पाकिस्तानला जायला बंदी आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जायला काय. अनेक मंत्री-आमदार जातात-येतात. आमचं वैयक्तिक वाद नाही. हा माणूसकीचा लढा आहे. अन्याय, अत्याचाराविरोधातील लढा आहे.

तुम्ही जाऊन दाखवा तिथं. यांचा काय भरोसा. यांनीचं सचिवांना पत्र पाठवा म्हणून सांगितलं, असेल, अशी शंका व्यक्त केली. पंतप्रधान काय करणार. त्यांनी हा प्रदेश केंद्रशासित करावा. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडं वजन आहे. मग, हा प्रदेश केंद्रशासित करून घ्यावा, असंही संजय राऊत म्हणाले.