Nashik | गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची विश्रांती, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला

| Updated on: Jul 27, 2022 | 12:32 PM

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आल्याने नदीच्या पाण्याची पातळी कमी झालीयं. यामुळे आता भाविकांची आणि पर्यटकांनी नदी काठावर मोठी गर्दी केलीयं. गोदा काठावर साप्ताहिक भाजी बाजार देखील भरला आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस संपूर्ण नाशिक जिल्हात सुरू होता.

Nashik | गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची विश्रांती, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला
Follow us on

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात पावसाने विश्रांती घेतलीयं. यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलायं. शहरात गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झालीयं. गोदा काठावरील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस (Rain) सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. यामुळे गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, आता पावसाच्या विश्रांतीमुळे पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलायं. इतके नाही तर आता गोदा काठावर साप्ताहिक भाजी बाजार देखील भरला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची विश्रांती

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. जिल्हातील अनेक नद्यांना पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, धरण क्षेत्रातील पाऊस कमी झाल्याने आता गंगापूर धरणातील विसर्ग थांबवण्यात आला आहे. यामुळे गोदा काठावरील जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

हे सुद्धा वाचा

जुलै महिन्यात नाशिक जिल्हात दमदार पाऊस

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आल्याने नदीच्या पाण्याची पातळी कमी झालीयं. यामुळे आता भाविकांची आणि पर्यटकांनी नदी काठावर मोठी गर्दी केलीयं. गोदा काठावर साप्ताहिक भाजी बाजार देखील भरला आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस संपूर्ण नाशिक जिल्हात सुरू होता. जून महिन्यात पावसाने नाशिककडे पाठ फिरवली होती. मात्र, जुलै महिन्यात जोरदार पाऊस नाशिक जिल्हात झाला आहे.