कोल्हापूर : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली. पण, ते अपक्ष म्हणूनचं विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आहेत. सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, भाजपमध्ये येण्याविषयी ऑफर आली नव्हती. असं काही घडलेलं नाही. या चर्चा कारण नसताना भाजपची मंडळी पेरतात, असं मला वाटतं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी २०-२५ वर्षे दिलेली असतात. मी १९९२ पासून एनएसयूआयपासून काम करतोय. एनएसयूआयमधून सुरू केलेल्या राजकीय कार्यकालाला आता जूनमध्ये ३० वर्षे होतील.
आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं असतं. पक्ष सोडण्याच्या एखाद्या चर्चेमुळे त्याचं राजकीय करियर खराब होऊ शकतो. एखाद्याच्या करिअरबाबत बातम्या देताना विचार करावा, असंही सतेज पाटील यांनी सांगितलं.
अशा चर्चा करताना गांभिर्याने करावा. राज्यात आमच्या सत्तेच्या काळात आम्ही गोकुळवर प्रशासक आणू शकलो असतो. गेल्या अडीच वर्षात राजाराम कारखान्यावर कारवाई करू शकलो असतो. पण आम्ही तसं केलं नाही.
ज्यांनी तक्रार केली त्यांचे स्वागतच. मात्र त्यात गेल्या पंचवीस वर्षाच्या कारभाराच्या देखील चौकशीच्या उल्लेख करायला हवा होता. गोकुळ दूध संघाच्या चाचणी लेखापरीक्षणावरून सतेज पाटील यांचा शौमिका महाडिक यांना टोला लगावला.
यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, सत्यजित तांबे यांना पक्षाने डावललं नाही. कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबीयांनी घ्यायचा होता. कोरा एबी फॉर्म तांबे यांना दिला होता. मग तांबे यांना डावललं असं कसं म्हणता येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वरिष्ठांनी तांबेंच्या बाबतीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे राजकीय संस्कृती आम्ही पाहतोय. विरोधी नेता आला तर नमस्कार करायचा नाही का, आम्ही असे संस्कार पाहिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.