शिर्डी : शिर्डी (Shirdi) साई मंदिराचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याचिका दाखल केली होती. आघाडी सरकारने नेमलेले विश्वस्त मंडळ (Sai Mandir Trust) बरखास्त केल्याने हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. साईसंस्थानच्या घटनेनुसार नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप होता. पुढील आठ आठवड्यात नविन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश कोर्टाने दिलेत.