दुर्गाडी किल्ल्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने; कोणावर होणार देवीची कृपा?

| Updated on: Sep 20, 2022 | 7:34 PM

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव कोण साजरा करणार यावरुन शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.

दुर्गाडी किल्ल्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने; कोणावर होणार देवीची कृपा?
Follow us on

मुंबई : शिवतीर्थ अर्था शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा(Shivsena Dasara Melava 2022) होणार यावरुन उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. त्यातच आता कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरुन(Kalyan Durgadi Fort) ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने आला आहे. यामुळे आता दुर्गाडी देवीची कृपा कोणावर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगल असताना आता कल्याणात आणखी एक नवीन वादाची ठिणगी पडली आहे.

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव कोण साजरा करणार यावरुन शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.

दोन्ही गटांच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे परवानगी मागितली आहे. जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुर्गाडी किल्ल्याच्या निमित्ताने नवरात्री अगोदर कल्याणमध्ये राजकीय गरबा रंगला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा कोण पुढे सुरू ठेवणार? यावरून देखील चढाओढ निर्माण झाली आहे.

1968 साली कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर पूजा-अर्चाना करण्यासाठी बंदी हूकूम जारी करण्यात आले होते. या वेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपत्नीक बंदी हूकूम मोडून देवीची पूजा केली.

तेव्हापासून आजर्पयत दरवर्षी दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. शिवसेनेच्या नियमाप्रमाणे किल्ले दुर्गाडी देवीच्या नवरात्र उत्सवाचा अध्यक्ष हा शहर प्रमुख असतो.

मात्र, शिंदेंचे बंड आणि त्यानंतरच्या सत्तांतरानंतर सर्व चित्र बदलल आहे. यंदा या उत्सवावर देखील शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट वादाचं सावट आहे.

उद्धव ठाकरे गटातील शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिंदे गटातील शहर प्रमुख व विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे नवरात्र उत्सव साजरा करत पूजेचा मान देण्याची परवानगी मागितली आहे.

दोन्ही गटांकडून परवानगी आम्हालाच मिळणार असा दावा केला जातोय. त्यामुळे ही परवानगी कोणाला द्यावी यावर अजून जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही.

मात्र, आता आत्ता जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देणार आणि कोणावर देवीची कृपा होणार हे पाहव लागेल.