काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि ठाण्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबईत तर काहींच्या घरात पाणी शिरलं आहे. सर्वत्र दाणादाण उडाल्याचं चित्र आहे. मुंबई आणि ठाण्यात लोकल ट्रॅकवरच पाणी आल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे बदलापूर ते ठाणेपर्यंतच लोकल सोडली जात आहे.