नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पावरुन महाराष्ट्रातलं वातावरण तापताना दिसत आहे. राज्य सरकारने 10.64 टीएमसीचा प्रकल्प मान्य केला आहे. पण या प्रकल्पावरुन उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. नार-पार खोऱ्यातील 30 टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्राला मिळावेत, अशी मागणी खान्देश हित संग्राम संघटनेची आहे. याबाबत उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि मंत्री भूमिका मांडत नसल्याचा आरोप करत खान्देश हित संग्राम संघटनेकडून जवळपास 25 आमदार आणि मंत्र्यांना साडी चोळीचा आहेर पाठवण्यात आला आहे.