Wardha Illness : वर्धा जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचे 9 रुग्ण पॉझिटिव्ह, जनावरांना होणारा आजार माणसांनाही

| Updated on: Sep 07, 2022 | 11:09 PM

छोट्या किटकांकडून पायावर दंश झाल्याने हा आजार होतो. लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. तीव्र ताप येणे, अंगदुखी, स्नायूदुखी, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून येतात. याकडं की दुर्लक्ष करू नये, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी राज पराडकर यांनी केलं आहे

Wardha Illness : वर्धा जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचे 9 रुग्ण पॉझिटिव्ह, जनावरांना होणारा आजार माणसांनाही
वर्धा जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचे 9 रुग्ण पॉझिटिव्ह
Image Credit source: t v 9
Follow us on

वर्धा : एरवी जनावरांना होणाऱ्या लेप्टोस्पायरोसीस (Leptospirosis) या आजाराचे रुग्ण मनुष्यातदेखील आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यात तब्बल नऊ जणांचे अहवाल लेप्टोस्पायरोसिस पॉझिटिव्ह (Positive) आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अनेक जनावरांना लेप्टोस्पायरोसीस व थायलेरिओसीस (Theileriosis) या रोगाची लागण झाली होती. पशू संवर्धन विभागाच्या चमूनं जनावरांची तपासणी केली. तेव्हा ही बाब पुढ आली होती. यावर युद्धपातळीवर उपाययोजना करत नियंत्रणही मिळवलं. मग या अनुषंगानं आरोग्य विभागानं तीन तालुक्यात तापसदृश्य रुग्णांचे रक्त नमुने तपासणीला पाठवले. त्यातील नऊ जणांना लेप्टोस्पायरोसीस आजारानं ग्रासल्याची माहिती पुढे आली. सेवाग्रामच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर 9 रुग्णांना लेप्टोस्पायरोसीस आजारानं ग्रासल्याची माहिती पुढे आली. रुग्णांची प्रकृती चांगली आहे.

अशी असतात रोगाची लक्षणं

छोट्या किटकांकडून पायावर दंश झाल्याने हा आजार होतो. लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. तीव्र ताप येणे, अंगदुखी, स्नायूदुखी, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून येतात. याकडं की दुर्लक्ष करू नये, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी राज पराडकर यांनी केलं आहे.

असा पसरतो आजार

लेप्टोस्पायरोसीस हा गाय, बैल, वासरू, म्हैस, रेडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, श्वान, मांजर यास प्रामुख्यानं लागण होते. कुरतडणारे प्राणी उंदीर, घुस अशा वाहकांमुळं, दूषित पाणी, दूषित मूत्र, दूषित मातीद्वारा याचा प्रसार होतो. आजार टाळण्यासाठी जनावरांसोबतच स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. माणसापासून पशुंना किंवा पशूंपासून माणसांना होणाऱ्या आजारांची संख्या बरीच आहे. त्यामुळं दोघांनीही एकमेकांपासून काळजी घेतली पाहिजे.

हे सुद्धा वाचा