नवी दिल्ली – प. बंगालच्या ( W. Bangla)हावडामध्ये लाखो रुपयांच्या रोख रकमेसह अटक करण्यात आलेले झारखंडचे तीन काँग्रेसच्या आमदारांना पक्षाने निलंबित (3 Congress MLA suspended) केले आहे. झारखंड प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ही घोषणा केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत भाजपा (Operation Lotus)झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सध्या एक मुख्यमंत्री सगळ्या आमदारांच्या संपर्कात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच एक केंद्रीय मंत्री आमदारांना ईडीची भीती दाखवर आहेत. अविनाश पांडे यांनी आरोप केला की – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ८ वर्षांत देशात बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक विपन्नतेचा इतिहास रचण्यात आला. आत्ता चिंतेची बाब ही आहे की, लोकशाहीच्या चिंधड्या उडवण्यात येत आहेत, निवडून आलेल्या सरकारांना हटवण्यासाठी देशात नंगा नाच घालण्यात येतो आहे. ज्या ज्या राज्यात गैरभाजपा सरकारं आहेत, तिथे ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करुन ती सरकारे अस्थिर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
Congress suspends 3 Jharkhand MLAs who were held in West Bengal with huge amount of cash
हे सुद्धा वाचाRead @ANI Story | https://t.co/xwHqOQcAoR#jharkhandcongress #WestBengalPolice pic.twitter.com/MXN9spEHeM
— ANI Digital (@ani_digital) July 31, 2022
झारखंड सरकार सुरक्षित आहे. सरकारला कोणताही धोका नाही आणि सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील असा दावाही त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिघी, काँग्रेस पक्षातील जबाबदारी असलेले पदाधिकारी किंवा सामान्य कार्यकर्ता, या सगळ्यांची माहिती आमच्याकडे आहे. जो कुणीही या भाजपाच्या सरकार उलथवण्याच्या कटात सहभागी असल्याचे समोर येईल, त्याच्याविरोधात पक्ष कारवाई करेल, असेही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास प. बंगालमध्ये हावडाजवळ, झारखंडच्या एका काँग्रेस आमदाराची गाडी पकडण्यात आली, त्यात कोट्यवधी रुपये असल्याची माहिती आहे. या गाडीतून पूर्व मिदनापूरकडे जात असलेल्या तीन आमदारांना यावेळी अटक करण्यात आली होती.
तर दुसरीकडे प. बंगालमध्ये शुक्रवारी जे काही उघडकीस आले ते भाजपाचे ऑपरेशन लोटस नव्हे तर ऑपरेशन चिखल होते, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवन खेडा यांनी केली आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारला हटवण्यासाठी मोठ्या धनाचा वापर केला आहे, असा आरोप झारखंड प्रदेश काँग्रेसने केला आहे. सोरेन यांच्या झारखंडमधील सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या दोन्ही पक्षांचा समावेश आहे.